शेतकरी बापाची व्यथा; उसाचे पैसे न मिळाल्यामुळे उपचाराअभावी आजारी मुलीचा जीव धोक्यात
स्वतःच्या ५० टन ऊसाचे पैसे कारखान्याकडून येणे असतानाही मूलीचा उपचार होऊ शकत नाही
- by Adarsh Maharashtra
- Dec 06, 2018
- 1906 views
सातारा: हृदयाला छिद्र असणाऱ्या आपल्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन उपचारासाठी वणवण फिरणा-या हतबल शेतकरी बापाची व्यथा या एकूणच शासन व्यवस्थेचा फ़ोलपणा दाखवण्यासाठी पुरेसे ठरते. फलटन तालुक्यातील ढवळ गावाचे रहिवासी अनिल यशवंत माने यांच्या चार वर्षाच्या मुलीला हृदयाला छिद्र असल्याने ऑपरेशन करणे अत्यावश्यक आहे. परंतू आर्थिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने पैशाअभावी माने यांच्या मुलीचे ऑपरेशन होऊ शकत नाही, त्यामुळे मुलीच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. माने सध्या रायचूर छत्तीसगढ़ येथील सत्य साईबाबा हॉस्पिटलमध्ये मुलीला उपचारासाठी घेऊन गेले आहेत, तेथील डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलाय, परंतू पैशाअभावी माने हतबल झाले आहेत. स्वतःच्या ५० टन ऊसाचे पैसे कारखान्याकडून येणे असतनाही मूलीचा उपचार होऊ शकत नाही यामुळे माने व्यथित आणि अस्वस्थ झाले आहेत. माने यांच्या शेतातील ५० टन ऊस न्यू पलटन शुगर वर्क्स,साखरवाडी या कारखान्याला विकण्यात आला, परंतू नऊ महिने झाले तरी त्याचे पैसे अजून माने यांना मिळाले नाही. माने यांनी पैशासाठी अनेक वेळा कारखान्याकड़े विनवनी केली परंतू कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळूंखे पाटिल आणि कार्यकारी संचालक धनंजय साळूंखे पाटिल हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आले. कारखान्याने माझ्या हक्काचे, ऊसाचे पैसे लवकरात लवकर दिले नाहीत आणि जर माझ्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळूंखे पाटिल आणि कार्यकारी संचालक धनंजय साळूंखे पाटिल यांच्यावर असेल. याची दखल पोलिस प्रशासन , जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी घ्यावी असे आवाहन त्यांनी एका व्हिडिओ द्वारे केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम