सातारा राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आ. शशिकांत शिंद यांचा जनतेसाठी जनता दरबार

सातारासातारा राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सातारा जिल्ह्यातील जनतेसाठी जनता दरबार घेतला. जिल्ह्यातील शेतकरी ,कामगार , व्यावसायिक, महिला, तरुण , जेष्ठ नागरिक आज मोठ्या संख्येने येऊन मला भेटले आणि आपल्या समस्या माझ्यासमोर मांडल्या. प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यावेळी केला. आदरणीय शरदचंद्रजी पवार  व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेल्या अनेक वर्षांपासून सातारा पक्ष कार्यालयात जनता दरबार आयोजित करून जनतेला आपल्या समस्या, प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सभागृहात काम करत असतो ,त्या लोकांसाठी उपलब्ध असणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील केंद्रबिंदू मानून जनता दरबार भरविला जातो. यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक लोक येऊन आपली सामस्या मांडतात. प्रत्येकाच्या कामाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो. 

सध्या कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या समोर अनेक प्रश्न वाढले आहेत. आरोग्य विषयक अडचणी, रोजगार, व्यवसाय संबंधी अडचणी, महिला,तरुण, दिव्यांग लोकांचे प्रश्न  तसेच शेतकऱ्यांचे वीज, पाणी, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असे अनेक प्रश्न भेटायला येणाऱ्या लोकांनी मांडले. गेले दोन दिवस पाऊस मोठया प्रमाणात पडतो आहे आणि पुढेही काही दिवस राहणार आहे. या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यांनीही आपले प्रश्न यावेळी मांडले. त्वरित सरकारकडून याचा मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील असे यावेळी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट