
बेपत्ता १५७ मुलांचे गूढ कायम,वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमध्ये पाच वर्षांत अडीच हजार अल्पवयीन मुले गायब होण्याचे प्रकार !
- by Adarsh Maharashtra
- Dec 30, 2020
- 795 views
वसई :वसई-विरार आणि मीरा भाईंदर शहरातून मागील पाच वर्षांत बेपत्ता झालेल्या अडीच हजारांहून अधिक अल्पवयीन मुलांपैकी १५७ मुला-मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही.त्यांचे पुढे काय झाले ? याचे गूढ अद्याप कायम आहे.या बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे.अल्पवयीन मुले विविध कारणांमुळे घरातून निघून जातात तर काहींचे अपहरण केले जाते.अल्पवयीन मुले बेपत्ता झाली तर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो.
वसई-विरार तसेच मीरा-भाईंदर शहरातून दररोज दिवसाला एक मुलगा किंवा मुलगी बेपत्ता होत असते.यातील बहुतांश मुली या प्रेमप्रकरणातून घरातून निघून जातात किंवा त्यांना फूस लावून पळवून नेले जाते.मागील पाच वर्षांत म्हणजे २०१६ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत विरार आणि मीरा-भाईंदर शहरातून दोन हजार ५४८ मुले-मुली बेपत्ता झाल्या होत्या.त्यात ८४६ मुले आणि एक हजार ७०२ मुलींचा समावेश होता.त्यापैकी दोन हजार ३९१ मुलांचा शोध लागला आहे. मात्र अद्यापही १५७ मुलामुलींचा शोध लागलेला नाही.बेपत्ता असलेल्यांमध्ये ३० मुले आणि १२७ मुलींचा समावेश आहे.
पालकांमध्ये आपल्या मुलांचे काय झाले ? याची चिंता भेडसावत असून ते सतत पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत.नव्याने स्थापन झालेल्या मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची विभागणी ३ परिमंडळांत करण्यात आली आहे. सर्वाधिक बेपत्ता मुले विरारच्या परिमंडळ ३ मधून बेपत्ता झाली आहेत.त्यात विरार, तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्याचा समावेश होतो. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एक हजार ५३५१ मुलेमुली बेपत्ता झाली आहेत त्यात ५४० मुले आणि एक हजार ७२ मुलींचा समावेश आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम