
कोरोनामुळे तंबाखू प्रतिबंधित गुटख्याचे सेवन करण-या नागरीकांच्या खिशाला कात्री बाजारात विकल्या जातात चार पटीच्या दरात या वस्तु
- by Adarsh Maharashtra
- Apr 26, 2020
- 1156 views
नवीमुंबई:(सुनिल गायकवाड) कोरोना महामारी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणुन शासनाने मार्च च्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी सुरु केली त्या टाळेबंदीची वाढ 3 मे पर्यंत केली आसल्याने ज्या नागरिकांना व्यसनाची मोठ्या प्रमाणात सवय आहे त्या व्यसनी नागरीकांची फार मोठी पंचाईत झाल्याचे चित्र दिसत आहे.
या संधीचा फायदा छुप्या मार्गाने तंबाखू गोवा गुटखा व इतर नशेली पदार्थ विक्री करणा-या विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे .
कोरोना रोगाच्या साथीची कोणतीच चिंता आणि पर्वा नसल्याचे चित्र समोर आहे.
या कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात सर्रास हे नशीली पदार्थ चोरीचुपके पण विकले जातात. अधीच हाताला काम नसल्याने कोणतीच आवक नसतांना सुध्दा व्यसनाने ग्रासलेले नागरीक कोणत्या थराला जातील याची शाश्वती राहीली नाही. बाजरभावात दहा ते पंधरा रुपयाच्या आसपास मिळणारे एखादी तबांखूची पुडी आजच्या रोजी या नागरिकांना 50 ते 60 रुपये पर्यंत घेण्याची वेळ आली आहे. या नशीली पदार्थ विक्री करण्याचा गोरखधंदा फार मोठ्या प्रमाणात तेजीत सुरु आहे.
दरम्यान: एक गोष्ट मात्र निश्चित आहे आमच्या प्रतिनिधीने या पदार्थांचे सेवन करणा-या एका नागरिकाला या बाबत विचारना केली असता त्यांनी तंबाखू प्रतिबंधीत गोवा गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहीती दिली त्याच प्रमाणे या वस्तूंची किंमत बाजारभावाच्या दरापेक्षा तीनपट जास्त दर घेतली जाती आशी माहीती देखिल त्यांनी दिली टाळेबंदी काळात आमचा नाइलाज झाल्याने आम्हाला काहीही करुन या विक्रेत्यांनी सांगितलेली किंमत द्यावी लागते.
हे व्यसन आम्हाला इतकं जडले आहे कि आम्ही त्यांचे सेवन केले नाही तर मन शांत बसत ना आणि भूक सुध्दा लागत नसल्याची खंत या नागरिकांनी व्यक्त केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम