
राज ठाकरेंच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
आज वर्धापन दिनी मनसेचे शॅडो कॅबिनेट
- by Adarsh Maharashtra
- Mar 09, 2020
- 1767 views
नवी मुंबई (प्रतिनिधी) : आज राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चौदावा वर्धापन दिन असून वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे मनसेच्या शॅडो कॅबिनेट घोषणा करणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच मनसेचे मुंबईत राज्यव्यापी अधिवेशन झाले होते त्यानंतर मनसेच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि तेंव्हापासून मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खास करून मनसेने आपला झेंडा आणि भूमिकेत जो बदल केला होता त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात काही प्रमाणात बदल जाणवू लागले होते. भारतातील घुसखोर बांगलादेशी आणि पाकिस्तानी लोकांना शोधून देशाबाहेर काढण्याचा राज ठाकरेंच्या भूमिकेचे भाजपसह सर्वच हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी स्वागत केले होते मात्र मनसे कार्यकर्त्यांची घुसखोरांना शोधून काढण्याची भूमिका सत्ताधारी पक्षांना खास करून काँग्रेसला आवडली नव्हती .त्यामुळे काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे तर दुसरीकडे शिवसेना भाजपा पासून दूर गेल्याने मनसेच्या रूपाने भाजपला एक नवा मित्र मिळणार असे बोलले जात होते कारण देशभर सीएए आणि एनआरसी ला विरोध होत असताना मनसेने मात्र पाठिंबा दिला होता मात्र भाजपने मनसे बाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आज मनसेचा वर्धापन दिन होत असल्याने राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान काल राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन यात वर्धापन दिन तसेच शॅडो कॅबिनेट बाबत चर्चा करून कोणाला कोणती जबाबदारी द्यायची यावर मते जाणून घेतली. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर कालची बैठक खूप महत्त्वाची होती.
नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी तयारी
मनसेचा वर्धापन दिन नवी मुंबईत साजरा करण्यामागे नवी मुंबई महापालिकेची होऊ घातलेल्या निवडणुकीची तयारी हेच कारण असून मनसे या निमित्ताने नवी मुंबईत गणेश नाईक जवळीक साधण्याची दाट शक्यता आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम