'दिल्लीमधील जामा मशिद पाडा; मुर्ती मिळाल्या नाही, तर फासावर लटकवा'!
आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत. अयोध्येत राम मंदिर निर्माणावरून रणकंदन माजले असतानाच त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजधानी दिल्लीमधील जामा मशिद पाडा, त्या ठिकाणी मूर्ती न मिळाल्यास मला फासावर लटकवा असे भडकावू वक्तव्य साक्षी महाराजांनी केले.
- by Adarsh Maharashtra
- Nov 23, 2018
- 2220 views
उन्नाव,उत्तर प्रदेश: आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत. अयोध्येत राम मंदिर निर्माणावरून रणकंदन माजले असतानाच त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजधानी दिल्लीमधील जामा मशिद पाडा, त्या ठिकाणी मूर्ती न मिळाल्यास मला फासावर लटकवा असे भडकावू वक्तव्य साक्षी महाराजांनी केले.
साक्षी महाराज म्हणाले की, मी जेव्हा राजकारणामध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा मी पहिले वक्तव्य हेच केले होते. मी म्हणालो होतो अयोध्या, मथुरा सोडून द्या, दिल्लीची जामा मशिद पाडून टाका, त्या ठिकाणी शिड्यांवर मुर्त्या मिळाल्या नाही, तर मला फासावर लटकवा. मी त्या वक्तव्यावर आजही कायम आहे. मुघलांनी हिंदूच्या भावनाची प्रतारणा केली असून तीन हजार मशिदी त्यांनी मंदिर पाडून केली आहेत.
राम मंदिर निर्माणावरून अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अयोध्येला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. विश्व हिंदू परिषदेने सुद्धा आंदोलनाला प्रारंभ केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा अयोध्या दौऱ्यावर आहेत. राम मंदिर निर्माणावरून भाजपची भूमिका स्पष्ट असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपा अध्यक्ष मायावती आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी साक्षी महारजांनी केली. सोमनाथ मंदिरांप्रमाणेच राम मंदिरासाठी सरकार कायदा करेल अशी आशा साक्षी महाराजांनी व्यक्त केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम