निवडणुकांत भाजपचे मोदी सरकार ईव्हीएम यंत्रात गडबड करण्याची शक्यता: देशातील २३ राजकीय पक्षांनी पुन्हा केली मागणी

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली

मुंबई - मतदानासाठी वापरात असलेल्या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) यंत्रांचे तंत्रज्ञान जुने आहे. या यंत्रात विविध मार्गांनी छेडछाड शक्य आहे. त्यामुळे १७ व्या लोकसभेच्या निवडणुकांत भाजपचे मोदी सरकार ईव्हीएम यंत्रात गडबड करण्याची शक्यता आहे, असा आरोप करत लोकशाही वाचवण्यासाठी ५० टक्के व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) यंत्रातील चिठ्ठ्यांची मोजणी करावी, अशी मागणी देशातील २३ राजकीय पक्षांनी पुन्हा केली आहे.यासंदर्भात मुंबईत सर्वपक्षीय प्रतिनिधींनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, आपचे संजय सिंह यासह तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीआय, सीपीएम, फाॅरवर्ड ब्लाॅक आदींचे नेते उपस्थित होते. आंध्रचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू यांनी या वेळी ईव्हीएम यंत्रातील छेडछाडीसंबंधी पीपीटी सादरीकरण केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रासाठी ९ हजार कोटी खर्च झाले. या यंत्रांचे ऑडिट होत नाही. ती ५ वर्षांतून एकदा वापरली जातात. त्यांच्या मेमरी चिपमध्ये गडबड करणे शक्य आहे. हे सर्व संभ्रम निर्माण करणारे आहे. म्हणून निवडणूक आयोगाने (ईसी) किमान ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील चिठ्ठ्यांची मोजणी करून त्या ताडून पाहायला हव्यात. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांत तफावत न आढळल्यास मतदान प्रक्रियेवरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल.’देशातील २३ राजकीय पक्षांना ईव्हीएम नको आहे. या पक्षांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत ७० टक्के मतदान झाले होते. या राजकीय पक्षांच्या मतांचा अव्हेर करून निवडणूक आयोग बहुमताच्या कौलाचा अनादर करत आहे, असा आरोप चंद्राबाबू यांनी या वेळी बोलताना निवडणूक आयोगावर केला.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट