सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केले सावरकर भित्तीचित्र उद्घाटन

थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करून कृतीशील अनुयायी व्हा - रणजित सावरकर

ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते आणि नगरसेवक दिलीपराव बारटक्के यांच्या संकल्पनेतून श्रीराधाकृष्ण मंदिराजवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि विक्रमराव सावरकर यांचे सुपुत्र रणजित सावरकर यांच्या हस्तेकरण्यात आले.

यावेळी आपले विचार प्रकट करताना रणजित विक्रमराव सावरकर म्हणाले की, "देशात व राज्यात सत्ता कुणाचीही असो पण राज्य हे हिंदुचे असलेच पाहिजे. थोर महापुरुषांचे नुसते प्रेमी किंवा भक्त न होता आपण त्यांचे विचार प्रत्यक्षात आत्मसात करुन कृतीशील अनुयायी होण्याची आज आवश्यकता आहे."

यावेळी उपमहापौर पल्लवीताई कदम, नगरसेविका सौ. कांचनताई चिंदरकर,  हिंदुमहासभा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री. रॉकी हिंदुस्थानी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर , हिंदुमहासभा गौरक्षा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पांडुरंगराव भिसे, हिंदुमहासभा गौरक्षा आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. बाबुराव कोठरगी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ठाणे धारकरी अशोकराव वायकुळे, वंदेमातरम् प्रतिष्ठान उपाध्यक्ष संदेशराव विचारे, वंदेमातरम् प्रतिष्ठान कोषाध्यक्ष अमोलराव देसाई, वंदेमातरम् प्रतिष्ठान सदस्य अविनाशराव आहेर, शिवसेना विभागप्रमुख रामचंद्रजी गुरव, शिवसेना उपविभागप्रमुख महेशराव लोखंडे, शिवसेना उपविभाग प्रमुख विजयराव देवळेकर, शिवसेना विभाग महिला संघटक जयश्रीताई बारटक्के, महिला संघटक विद्याताई कोवारकर,  उपशाखाप्रमुख तथा गणेश मित्र मंडळ अध्यक्ष बाबुराव खेतले, युवा सेना सदस्य तन्मय घाडीगांवकर तसेच राष्ट्रप्रेमी नागरिकांसह विविध हिंदुत्ववादी संस्था-संघटनांचे प्रतिनिधी-कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट