
आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करा...” भाजपाचे ठिय्या आंदोलन - डॉ. किरीट सोमैया
- by Adarsh Maharashtra
- Feb 02, 2021
- 459 views
ठाणे :विहंग गार्डन ठाणेच्या 13 मजल्याच्या दोन इमारतींचे अनधिकृत बांधकाम करणारे विकासक श्री. प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी कारवाई व त्यांच्याकडून 11 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा या मागणीसाठी आज भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्यासमवेत आमदार श्री. निरंजन डावखरे, गटनेते श्री. संजय वाघुले, नगरसेवक श्री. मिलिंद पाटणकर, आणि कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या बाहेर प्रतिकात्मक ठिय्या आंदोलन केले.
आंदोलकांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले व काही वेळेनंतर सुटका केली.
ठाकरे सरकार श्री. प्रताप सरनाईक यांना वाचवित आहेत. 11 कोटींचा दंड माफ करण्याची बात करीत आहेत व फौजदारी कारवाई करण्यास चालढकल करीत आहेत. असे डॉ. किरीट सोमैया यांनी या प्रसंगी सांगितले.
शिवसेना नेता बिल्डर आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथे विहांग गार्डन B1 आणि B2 या 13 मजल्याच्या दोन अनधिकृत इमारती बांधून 100 हुन अधिक सदनिकाधारकांची फसवणूक केली आहे. 2008-09 आणि 2012 मध्ये ठाणे महानगरपालिकेने या इमारतीला वापर परवाना देण्याचा इन्कार केला व या इमारती अनधिकृत आहेत असे घोषित केले. त्यानंतर 2012 मध्ये ठाणे महानगरपालिकेने, महाराष्ट्र सरकारने या बिल्डिंग पाडण्याचे आदेश दिले.
श्री. प्रताप सरनाईकच्या विनंतीला मान देऊन 2012-13 मध्ये या बिल्डिंगला नियमित (regularize), अनुमती देण्याचा प्रस्तावाला तत्कालीन शासनाने, ठाणे महानगरपालिकेने अनुमती दिली.
यासाठी विकासकांना TDR व दंड म्हणून रु. 3,33,96,842 भरण्याचे निर्देश देण्यात आले.
नियमाप्रमाणे श्री. प्रताप सरनाईक, बिल्डरनी 2008-09 ते 2021 पर्यंत हे अनधिकृत बांधकामाचे पेनल्टी, दंड म्हणून रूपये 11 कोटी भरणे अपेक्षित असताना त्यांनी फक्त रु. 25,00,000 इतकी रक्कम भरली आहे आणि उर्वरित दंड व फौजदारी कारवाई माफ करावी असा अर्ज श्री. प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ. किरीट सोमैया यांनी दिला. तसेच, श्री. प्रताप सरनाईक यांच्याकडून रूपये 11 कोटी किंवा आजच्या प्रमाणे जो दंड होणार तो ताबडतोब वसूल करावा व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम