उल्हासनगर व अंबरनाथ येथिल वाढत्या प्रदुषणाची प्रधान सचिवा कडे तक्रार दाखल

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांनी उल्हासनगर व अंबरनाथच्या वाढत्या प्रदूषणा  संदर्भात  प्रधान सचिव  पर्यावरण व वातावरणीय विभाग , महाराष्ट्र शासन  सौ मनीषा म्हैसकर  यांची भेट घेवुन त्याना प्रदुषणा बाबत निवेदन सादर केले आहे .  

रोहित साळवे यांनी प्रधान सचिव सौ . मनिषा म्हैसकर यांची  भेट घेऊन त्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की   उल्हासनगर , अंबरनाथ येथिल वालधुनी नदी पात्रात वारंवार होत असणारे प्रदूषण , व कारखाने तसेच टँकर द्वारे रसायनाची अनधिकृत विल्हेवाट  नदीपात्रात करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नदी काठावर राहणाऱ्या नागरिकाना या घातक रसायनाचा फार त्रास होत आहे 

नुकताच उल्हासनगर , अंबरनाथ शहरात व  पाले गाव  शिव मंदिर परिसर , कैलास कॉलनी , समतानगर .  भरतनगर येथे वायु प्रदूषणा  मुळे  लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होवुन श्वास घेन्यास वारंवार होणारा त्रास आणि डोळ्यात जळजळ होणे या प्रकाराने नागरिक रस्त्यावर आले होते . परंतु  सुदैवाने त्या वेळेस कोणती ही  जीवित हानी झाली  नाही, दरम्यान  मोठ्या प्रमाणात अजून ही  कारखानदार , व जीन्स कारखानदार सर्रास पणे प्रदूषण नियम धाब्यावर बसवून काम करत आहेत .तर ते  प्रदुषित रसायन वालधुनी नदीत सोडुन नदीला प्रदुषीत करत आहेत . 

त्यामुळे या कारखानदारांवर शासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यानी प्रधास सचिवाना दिलेल्या निवेदनात  केली आहे .

संबंधित पोस्ट