गारगाई धरण प्रकल्पातील बाधीत गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी

■ आमदार दौलत दरोडा यांनी जाणून घेतल्या प्रकलग्रस्तांच्या समस्या

पालघर(जयेश शेलार) मुंबई शहराला अधिक पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबई महानगर पालिका वाडा तालुक्यात ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात  गारगाई नदीचे पाणी अडवून या ठिकाणी मोठे धरण बांधणार आहे. प्रकल्पासाठीची जमीन संपादन, वन खात्याच्या परवानग्या तसेच अन्य प्रकारच्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या काही महिन्यांत सुरवात होणार आहे. मात्र या प्रकल्पात बाधीत होणारे चार गांवे व सहा पाडे यांच्या पुनर्वसन संदर्भात पुर्व तयारी झालेली नसल्याने प्रथम या बाधीत गांव, पाड्यांचे पुनर्वसन करावे व नंतरच या प्रकल्पाचे काम सुरू करावे अशी मागणी येथील आमदार दौलत दरोडा यांनी घेतली आहे.

वाडा तालुक्यातील 40 हुन अधिक गावे  शहापूर मतदार संघात येतात. या गावांचे लोकप्रतिनिधीत्व शहापूरचे आमदार दौलत दरोडा हे करीत आहेत.  त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामासंदर्भात त्यांनी वाडा येथे आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत परळी ग्रामीण रुग्णालयाचा रेंगाळत पडलेला प्रस्ताव, गारगांव प्राथमिक आरोग्य केंद्र व  आबिटघर आरोग्य उपकेंद्राची निर्मीती, भातपीकांच्या नुकसानीचे पंचनामे तसेच गारगाई प्रकल्प बाधित गावांचे पुनर्वसन या विषयावर चर्चा करण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित केली होती.

वाडा पूर्व भागात होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या संभाव्य गारगाई धरण प्रकल्पात बाधित होणाऱ्या गावांचं पुनर्वसन  हे गारगाई प्रकल्प सुरु होण्याच्या आधीच करावे, तसेच प्रकल्पात बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना त्यांची घरे, गावठाण तसेच शेतजमिनी व सर्व सोयी-सुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात  हा महत्त्वाचा विषय या बैठकीत घेण्यात आला. तसेच परळी येथे मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय, गारगांव प्राथमिक आरोग्य केंद्र  व आबिटघर आरोग्य उपकेंद्राच्या जागांचे हस्तांतर होऊन ही आरोग्य केंद्र लवकरात लवकर उभी रहावित तसेच परतीच्या पावसाने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत यासाठी आमदार दौलत दरोडा यांनी पुढाकार घेऊन  ही बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला वाडा प्रांताधिकारी  अर्चना कदम, तहसिलदार उद्धव कदम, मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक,  भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.  यावेळी बैठकीत गारगाई धरण प्रकल्पात बाधित होणाऱ्या गावांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट