
भिमपँथर राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांस : शीतल बनसोडे ह्या पीडित रिक्षाचालिकेला संपूर्ण न्याय मिळावा
- by Adarsh Maharashtra
- Oct 17, 2020
- 1356 views
ठाणे (प्रतिनिधी): गेल्या शुक्रवारी दिवा विभागातील रिक्षा चालवून आपली उपजीविका चालविणाऱ्या शीतल बनसोडे ह्या गरीब महिलेला रिक्षा लावण्याच्या वादातून तिथल्या एका बियर शॉपीच्या काही लोकांनी जबर मारहाण केली.ह्या प्रकरणी एक आरोपी अटकेत असून अन्य आरोपींनाही त्वरित अटक करण्यात यावी ह्या मागणीसाठी शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या दालनात भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख आणि कार्यकारी ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने भेट घेऊन मा.आयुक्त महोदयांना एक निवेदन दिले.
ह्यावेळी भिम आर्मीच्या नेत्यांशी चर्चा करताना मा.आयुक्त महोदयांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत " सदरहू पीडित महिला ही माझी सुद्धा भगिनी असून , ह्या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीरपणे आणि निष्पक्षपणे चौकशी सुरू असून तिला न्याय मिळवून देणे हे माझे नैतिक कर्तव्य असून अन्यायग्रस्त व्यक्तीला परिपूर्ण न्याय देण्याचाच माझा १०००% प्रामाणिक प्रयत्न असतो. " अश्या आश्वस्त करणाऱ्या शब्दांत आयुक्त महोदयांनी भिम आर्मीला विश्वास दिला की , तुम्हाला मी ह्या प्रकरणी आंदोलन करण्याची वेळ नक्कीच येऊ देणार नाही.ह्या चर्चेच्या वेळी ठाणे पोलीस सह आयुक्त मा.डॉ.सुरेशकुमार मेकाले आवर्जून उपस्थित होते.भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभलेल्या ह्या शिष्टमंडळात स्वतः पीडिता शीतल बनसोडे , सुप्रसिद्ध समाजसेवक मा.अमोलजी केंद्रे , भिम आर्मीचे उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी , ठाणे शहरप्रमुख मा.दिपराज सरदार , कल्याण लोकसभा क्षेत्र महासचिव मा.रविंद्रजी साळवे , दिवा शहरप्रमुख मा.प्रितेशजी पवार, मुंबईचे संघटक नेते भीमटायगर मा.किसनभाई ओव्हाळ,ज्येष्ठ साहित्यिक मा.विजयजी गरुड उल्हासनगर शहर भिम आर्मीचे महासचिव मा.जीवनभाई सुरडकर, यांचेसह नानासाहेब वानखेडे , अनिल महाजन , दिनकर ढिवरे , अरुणजी सरवदे आणि देविदास जाधव तसेच इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते,अशी माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम