BIG BREAKING रायगड जिल्ह्यात ५ मजली इमारत कोसळली, अनेक कुटुंब अडकल्याची शक्यता

काही तासांपासून हलत होती इमारत

रायगड, २४ ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कारण या इमारतीमध्ये ५५ पेक्षा अधिक फ्लॅट होते, अशी माहिती आहे. तसंच काही कुटुंब यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे.

महाड शहरातील काजळपुरा परीसरात ही इमारत होती. अनेक कुटुंबाचं वास्तव्य असलेली ही इमारत कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत मृत किंवा जखमी व्यक्तींचा नेमका आकडा समोर आलेला नाही.

एनडीआरएफच्या दोन टीम बचावकार्यासाठी रवाना झाल्या असून आणखी एक टीम पाठवण्यात येत आहे.

महाडमध्ये कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीचे युनुस शेख व पटेल हे ठेकदार होते. या इमारतीत एकूण ४० कुटुंब राहात होते. त्यातील २५ कुटुंब बाहेर पडले, पण  १५ कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदत कार्यासाठी तज्ज्ञांची गरज घ्यावी लागणार आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्या साठी प्रशासनासह स्थानिकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचं निदर्शनात आल्याने काही कुटुंब बाहेर पडली होती.

दरम्यान, मागच्या काही वर्षात या भागात सिंगल लोड बेअरिंग इमारतींचं प्रमाण वाढलं आहे.हा प्रकार जीवघेणं आहे आणि प्रशासन पण याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट