१७ करोड रुपयाच्या भरमसाठ आरोग्य साहित्याची खरेदी नेमकी कोणाच्या भल्यासाठी- मनसेचा सवाल

उल्हासनगर (रामेश्वर गवई) : उल्हासनगर महानगर पालिकेच्या वतीने  निविदांवर निविदा काढल्या जात आहेत. पण खरंच आपल्याला आता एवढया मोठ्या प्रमाणात आरोग्य साहित्याची आवश्यकता आहे का.? जेव्हा आपल्याला खरोखर गरज होती तेव्हा आपण हया सर्व  उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत. आता गरज नसतांना शासना कडुन येणाऱ्या कोटयावधी रुपयाच्या निधीचा असा वापर नेमका कुणाच्या भल्यासाठी असा खोचक प्रश्न मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे

शहरातील नागरिक आपल्या रुग्ण नातेवाईकाला घेऊन जेव्हा शहरभर उपचारासाठी दर-दर भटकत होते व जेव्हा शहरातील रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन व व्हेन्टिलेटर बेड मिळत नव्हते. तेव्हा कितीतरी रुग्णांनी ऑक्सिजन व व्हेन्टिलेटर बेड अभावी आपले प्राण गमावले आहेत . तेव्हा हया वस्तु आपण का खरीदी केल्या नाहीत असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे . मग आता नको तिथे ही उधळपट्टी कशासाठी आणि नेमकी कुणाच्या फायदयासाठी केली जाते.जेव्हा शहरातील लोकांना खरोखर आपल्या मदतीची गरज होती. तेव्हा शहरातील जनतेच्या पाठिमागे उभे न राहता आपण खाजगी रुग्णालयांच्या पाठिमागे मागे उभे राहिलो.जेव्हा खाजगी रुग्णालये लोकांची दोन दोन अडीच अडीच, तीन तीन  लाखाची बिल बनवत  होते. तेव्हा आपले प्रशासन फक्त कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त होते. शहरातील नागरिकांनी आपले  सोनं, घरदार विकून किंवा कर्ज काढून आपल्या नातेवाईकांची लाखो रुपयाची बील भरलीत तेव्हा प्रशासनाने हया उपाययोजना का केल्या नाहीत.तेव्हा जर हया उपाययोजना केल्या असत्या तर कितीतरी लोकांचे प्राण वाचले असते  असेही ही बंडू देशमुख म्हणाले.

डॉ राजा दयानिधी यांची उल्हासनगर महापालिका  आयुक्त पदी     नियुक्ती   झाली तेव्हा  शहरातील सर्वच नागरिकांना खुप आनंद झाला होता की एक डॉक्टर आयुक्त मिळाले आता कोरोना  संकटावर आम्ही सहज मात करु शकतो.तर आपल शहर लवकरच कोरोना मुक्त होणार आहे  तर  आजच्या रुग्णांची संख्या पाहता तसे झाले सुध्दा आहे.

दरम्यान मग ८  कोटी ८०  लाखाची निविदा काढली असुन त्यात ९०  हजार फेसशिल्ड, ८१  हजार गॉगल, ९०  हजार एन -९५   मास्क, ८१  हजार सर्जिकल  मास्क, व इतर साहित्य

२ कोटी ८०  लाखाची जी निविदा काढली आहे  त्यात २६२०  हॉस्पिटल बेड, १३५००  बेडशीट,५४००  ब्लॅंकेट, ५४००  सोलापुरी चादर,  २७००  शे पिलो व ईतर साहित्य खरेदी करन्याचे ठरविलेले आहे .

  दरम्यान मुरबाड रोड वरील ताबोर आश्रम येथे ४००  बेड साठी ऑक्सिजनची टाकी, पाईप लाईन फिटिंग, तसेच पार्टीशन साठी जवळपास  पास १  कोटी ५०  लाखाची निविदा काढली याची खरच गरज आहे काय असा प्रश्न बंडु देशमुख यानी केला आहे .

 या सह इतर ही निविदाही  काढल्या आहेत हे नेमक काय चाललय जनतेला पण कळू दया कारण शेवटी हे पैसे जनतेच्या करातले  आहेत. या संपूर्ण पैशातुन महानगर पालिकेच एक अत्याधुनिक रुग्णालय उभ राहु शकत.आणि त्याची आपल्या शहराला गरज देखील आहे. जर तुम्ही हे रुग्णालय उभ केल तर या शहरातील जनता आपली आयुष्यभर ऋणी राहिल. हे पैसे नको तिथे खर्च करण्याऐवजी आम्हांला एक सुसज्ज व अत्याधुनिक महानगर पालिकेचे   रुग्णालय दया अशी ही  विनंती मनसेच्या वतीने  आयुक्तांना करण्यात आली आहे.

जर आपण महापालिकेचे  रुग्णालय उभ करु शकत नसाल  तर हे पैसे या प्रकारच्या निविदेवर  खर्च करुन ठेकेदाराच भल करण्यापेक्षा या पैशातुन शहरातील प्रत्येक कोरोना  पॉझिटीव्ह नागरिकांचे  खाजगी रुग्णालयांचे  जे बिल आहे ते आपण महापालिकेच्या माध्यमातून भरण्याची मागणी सुध्दा बंडू देशमुख यांनी आयुक्तां कडे केली आहे.

आपल्याला ज्या गोष्टींचीं खरोखर गरज असेल तर  त्या आपण नक्की करा आम्ही आपल्या सोबत आहोत. पण गरज नसतांना जर कुणाच्या तरी फायदयासाठी हे सर्व करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा. उच्च न्यायालयात दाद मागेल असा इशारा आयुक्ताना दिलेल्या  निवेदनात दिला आहे .

दरम्यान या १७ करोड रुपयाच्या निवेदे बाबत महापालिकेचे जन संपर्क अधिकारी युवराज भदाणे याना विचारले असता ते म्हणाले की ही व्यवस्था पुढच्या दृष्टीकोनातुन करन्यात येत आहे सध्या पावसाळा सुरु आहे . नागरिक टेस्ट करन्या  करिता घरा बाहेर पडत नाहीत . कोरोनाला हलक्यात घेत आहेत . रोज ५००  रॅपिड ॲंटिजेन टेस्ट करन्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे . तेव्हा या १७ करोड रुपया मध्ये शहरहिताचे बरेच कामे होणार आहेत अशी प्रतिक्रिया युवराज भदाणे यानी दिली आहे .


संबंधित पोस्ट