Big BREAKING : दुबईहून केरळला येणाऱ्या विमानाला मोठा अपघात

विमानाचे झाले दोन तुकडे, तर वैमानिकाचा झाला मृत्यू

केरळ :केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडिच्या विमानाला अपघात झाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचं हे विमान होतं.विमान लँड करताना ते रन वे सोडून पुढे गेल्याचं हा अपघात झाल्याचं केरळचे कॅबिनेट मंत्री के राजू यांनी दिली आहे.या विमानात 191 प्रवासी आहेत. एअर इंडियाचं हे विमान दुबईहून आलं होतं, असं एअर इंडियानं सांगितलं आहे.

बोईंग 737 प्रकारचं हे विमान करुपूर धावपट्टीवर संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी लॅंड करत होतं. त्यावेळी हे विमान धावपट्टीवरून घसरलं.माजी मंत्री अल्फान्सो के. जे. यांनी आपल्या ट्वीटमध्ये पायलटचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

घटनास्थळाकडे किमान 24 रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या काही गाड्या तात्काळ रवाना झाल्याची माहिती आहे.

विमानाचे दोन तुकडे झाल्याचं समजतंय पण विमानाला आग लागलेली नाही. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी या दुर्घटनेबद्दल बोलताना सांगितलं की, "करिपूर विमातळावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि फायर ब्रिगेडला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना बचावकार्य तसंच वैद्यकीय मदत देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत."

एअर इंडियाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार विमानात 174 प्रवासी होते आणि 6 क्रू मेंबर्स होते, ज्यात दोन पायलट्सचाही समावेश होतो.

करिपूर विमानतळावर लँड करताना ही दुर्घटना घडली आहे. DGCA म्हणजेच नागरी उड्डाण संचलनालयाने या घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

DGCA ने दिलेल्या माहितीनुसार करीपूर विमानतळाच्या रनवे नंबर 10 वर उतरताना हे विमान घसरलं आणि याचे दोन तुकडे झाले.त्यावेळेस 2000 मीटरपर्यंत व्हीजिबलीटी होती असंही DGCA ने म्हटलं आहे.

विमान रनवेवर उतरल्यानंतर शेवटपर्यंत गेलं आणि त्यानंतर व्हॅलीतून खाली पडलं. त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले.अमिताभ कांत यांनी या दुर्घटनेविषयी व्टिटरवर लिहिलं,

"एअर इंडियाच्या जेटला झालेल्या दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसला आहे. मी कोळीकोडेला कलेक्टर होतो आणि मला माहितेय की हा विमानतळ कठीण ठिकाणी वसलेला आहे. हा विमानतळ टेकडीवर आहे आणि याचा रनवे 4500 ते 6000 फुट इतक्या भागात परसलेला आहे. या विमानतळावरून अनेक लोक आखाती देशांमध्ये प्रवास करत असतात. त्यांच्या सुरक्षितेसाठी मी प्रार्थना करतो."

केरळच्या दुर्घटनेमुळे आपण व्यथित झालो आहोत असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाला तात्काळ घटनास्थळी पोहचून राज्य सरकारला मदत करण्याचे आपण आदेश दिले आहेत असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट