नारळी पौर्णिमेनिमित्त खास Wishes, Greetings, Messages, SMS, WhatsApp Status, Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा आजचा सण!

श्रावण महिना सुरु झाला की सणांची रेलचेल सुरु होते. श्रावणी सोमवार ते शनिवार पर्यंतची एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते. तर आज सर्वत्र रक्षाबंधनासह नारळी पौर्णिमेचा सण ही सर्वजण साजरा करताना दिसून येणार आहे. नारळी पौर्णिमा हा खासकरुन कोळी बांधवांसाठी खास आणि मानाचा सण मानला जातो. कारण या दिवशी कोळीबांधव समुद्राची पूजा करत त्याला सोन्याचा नारळ दिला जातो. तर वर्षभर होड्यांनी मासेमारीला जाताना वरुणदेव प्रसन्न असल्याने तो आपल्याला सहाय्य करतो अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे. नारळी पौर्णिमेला होड्यांची सजावट केली जाते. तसेच कोळी बांधव नटूनथटून या दिवसाचा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा करताना दिसून येतात.

समुद्राला नारळ म्हणजेच श्रीफळ अर्पण करुन समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू थर्मात प्रथा आहे.श्रावणी पौर्णिमेस समुद्राला नारळ अर्पणासह त्याची पूजा झाल्यानंतर समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. वरुणदेवतेला आवाहन करताना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात असे मानले जाते. तर यंदाच्या नारळी पौर्णिमे निमित्त खास Wishes, Greetings, Messages, SMS, WhatsApp Status, Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा आजचा सण!

नारळी पौर्णिनेमिनित्त घरात नैवेद्यासाठी गोडाचे पदार्थ बनवतात. या पदार्थांमध्ये खासकरुन ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनवले जातात. समुद्राची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे घालतात अशी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट