
उल्हासनगर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता .
- by Rameshwar Gawai
- Jun 30, 2020
- 471 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरावर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असुन हे सर्व अनलॉक मुळे होत आहे तर या अन लॉक मुळे बेफिकीर नागरिक रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसत आहेत . त्यातच फिजिकल डिस्टंसिंगचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे उल्हासनगर शहर हे एक हप्त्या करिता पुन्हा लॉक डाऊन करन्याची मांगणी मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख . कॉंग्रेसचे सचिव रोहित साळवे आणि टिम ओमी कलानीचे अध्यक्ष ओमी कालानी यानी आयुक्ताकडे केली आहे त्यामुळे उल्हासनगर शहर हे पुन्हा लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे .
उल्हासनगर शहरात अनलॉक मुळे नागरिक असे वावरायला लागले आहेत की जसे काही कोरोना संपलेला आहे . रस्त्यावर नागरिक फिरत असताना फिजिकल डिस्टंसिंगचे ही भान नाही तर दुकाने सम विषम या पध्दतीने सुरु असताना काही दुकानदार सम विषम चे नियम ही पाळत नाहीत . तर दुकान बंद करन्याची दिलेली वेळ ही पाळत नसुन पोलिस येन्याची वाट दुकानदार बघतात . दरम्यान भाजी वाले फेरीवाले गल्ली बोळात फिरुन आपला धंदा करत असुन नियमाची पुर्णता पायमल्ली करत आहेत . याच अन लॉक मुळे उल्हासनगर शहरात कोरोना बाधितांचा आकडा १७५६ वर गेला आहे . नागरिकाना कोरोनाचे अजुन ही भय वाटत नसुन बिनधास्त पणे रस्त्यावर फिरत असताना दिसत आहेत . तेव्हा उल्हासनगर एक हप्त्या करिता पुर्ण पणे लॉक डाऊन करन्याची मांगणी मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख . कॉंग्रेसचे सचिव रोहित साळवे आणि टिम ओमी कलानी चे प्रमुख ओमी कलानी यानी नवीन आयुक्त डॉ राजा दयानिधी याना निवेदन देवुन केली आहे . तर शहरात कोरोनाचा वाढता आकडा बघता रुग्णालये कमी पडणार असुन सहा ते सात लाख लोक संख्या असलेल्या शहरात कोरोना दिवसे दिवस वाढत आहे मात्र येथिल कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर फक्त ९ आहेत . लोक संख्या किती आणि व्हेंटिलेटर किती ऐवढ्या व्हेंटिलेटर ने काय होणार प्रत्येक कोविड रुग्णालयात किमान पाच पाच तरी व्हेंटिलेटर असणे आवश्यक असताना फक्त ९ व्हेंटिलेटर ने काय होणार असा प्रश्न येथील सुज्ञ नागरिकाना पडला आहे. दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन होने गरजेचे आहे.तर ते ही अत्यंत कडक लॉकडाऊन असायला हवा आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम