
राम मंदिराच्या कामाला प्रारंभ; खोदकाम करताना सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब
- by Adarsh Maharashtra
- May 21, 2020
- 772 views
अयोध्या :राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद मिटल्यानंतर अखेर राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मागील दहा दिवसांपासून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी काम सुरू असून, जागेचं सपाटीकरण करण्यासाठी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले आहेत. देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तुंचे अवशेष सापडले आहे.
देशात करोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळी कामं ठप्प होती. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारनं बांधकामांना मूभा दिली असून, मागील दहा दिवसांपासून अयोध्येत राम मंदिराच्या कामालाही सुरूवात झाली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता.या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उभारण्यात येणाऱ्या नियोजित ठिकाणी जागेचं सपाटीकरण करण्याचं काम सुरू आहे. यासाठी खोदकामही करण्यात आलं असून, खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. दहा दिवसांपासून काम सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्या असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितलं. ते म्हणाले,"मागील दहा दिवसांपासून मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचं काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचे अवशेष सापडले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे," अशी माहिती राय यांनी दिली.
शतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी आयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतर सरकारनं न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं काम सुरू केलं आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम