
देशात कोरोना रुग्णांचा आकडा १.१२ लाखाच्या वर, तर ५,६०९ नवे रुग्ण
- by Adarsh Maharashtra
- May 21, 2020
- 1460 views
नवी दिल्ली, २१ मे:- जगभरात कोव्हिड १९ मुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणूचा नाश होण्याची चिन्ह नाहीत. भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आता लॉकडाउनचे चार टप्पे लागू करण्यात आले आहेत, परंतु तरीदेखील रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून जगभरात ती ११ व्या स्थानावर आहे.
गुरुवारी ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची ११२३५९ प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि ३४३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात विचार केला तर कोरोनाच्या प्रकरणांची संख्या ५० लाखांच्या पुढे गेली आहे.
दरम्यान मागील चोवीस तासांत देशात तब्बल ५ हजार ६०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १३२ जणांचा करोनाने बळी घेतला आहे.देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख १२ हजार ३५९ वर पोहचली आहे.या मध्ये सध्या उपचार सुरू असलेले ६३ हजार ६२४ रुग्ण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ३ हजार ४३५ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आलेली आहे.भारतात वैद्यकीय हाताळणी प्रभावीपणे केली जात असल्याने एक लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण फक्त ०.२ टक्के आहे. जगभरातील सरासरी ४.२ टक्के असल्याचे अगरवाल म्हणाले. उपचार होत असलेल्या रुग्णांपैकी २.९ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून ३ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ०.४५ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छसावर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम