लढा कोरोनाशी.......

कोरोना या या विषाणूने आज जगभरामध्ये थैमान घातला आहे.यामुळे अमेरिका चीन यासारख्या महासत्ता,, हैरान झाल्या आहेत आजच्या घडीला जगाचा कोरोना संक्रमिता चा आता आकडा लक्षात घेतला तर तो 40.75लाख इतका आहे. तर मृत्यूचा आकडा 2लाख 79 इतका आहे. त्यात भारताचे स्थान बघितलं तर संक्रमिता आजचा आकडा 62 हजार इतका आहे. व मृत्यूचे प्रमाण, 2हजार 101 इतके आहे. व त्यामध्ये महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास संक्रमित 28 हजार इतके आहेत. व मृत्यूचे प्रमाण 779 इतके आहे. महाराष्ट्र हा कोरोना संक्रमिताच्या संदर्भात भारताची राजधानी झाला आहे. वरील आकडे व प्रमाण आजचे आहे उद्या ह्यात वाढ झालेले असेल.हे आपल्याला उद्या लक्षात येईल.

कधी न आलेल्या संकटाचा सामना आज सर्व जग करत आहे. आज यावर ठोस उपाय म्हणून ,जागतिक स्तरावर कुठल्याही प्रकारचे लस आज उपलब्ध झालेली नाही.पण याचा अर्थ असा नव्हे,की जागतिक स्तरावर प्रयत्न चालू नाहीत म्हणून पण त्याला अजून तरी समाधानकारक यश प्राप्त झालेलं नाही.इतर राष्ट्राची तुलना करता भारतात वेळीच उपाययोजना म्हणून शासन व प्रशासन स्तरावर लॉक डाऊन चे पाऊल उचलण्यात आले. वेळीच याचा परिणाम म्हणून भारतात संक्रमिताचे व मृत्यूचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात आटोक्यात राहिले. यासाठी शासनाचे व प्रशासनाचे कौतुक करावे लागेल,तसेच शासनाचे पुढचे पाऊल म्हणजे कोरोना विषाणू चा प्रभाव कमी करणे हेच असेल या तत्वामुळे आज भारतात काही प्रमाणात यश प्राप्त झाले आहे.ही आपल्या सर्वसामान्यांसाठी सकारात्मक बाजू आहे पुढे सर्वसामान्यांची सोय म्हणून सरकारने एप्रिल ते जून हे तीन महिने मोफत राशन व गॅस ची सोय केली. आहे व तसेच जनधन खात्यांतर्गत गरिबांना किमान रक्कम अदा केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता काही प्रमाणात का होईना सुखावली आहे.
 आतंकी दहशतवाद व नक्षली दहशतवाद हे विशिष्ट प्रांता पुरते पण देशाला हादरविणाऱ्या दहशतवाद सर्वसामान्याच्या परिचयाचे होते व ते नित्याचे होते पण कधी नव्हे आशा 'जैविक' असणाऱ्या दहशतवादाने यात अचानक भर टाकली यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली.भारतातच नव्हे तर सर्व जग जागतिक जनतेच्या काळजाचे ठोके चुकले लहानग्यापासून ते वृद्धापर्यंत कोरोना विषाणूचा मानसिक दहशतवाद निर्माण झाला.याचाच परिपाक म्हणून कधी नव्हे आशा एकतेचे दर्शन जगाला घडले.जातिभेद धर्मभेद पंथभेद वंशभेद व प्रादेशिक वाद न मानता आज सर्व जनता एकजुटीने कोरोना या विषाणूच्या विरोधात उभी ठाकली कोण कुणाचा शत्रु व कोण कोणाचा मित्र हे भेद क्षणात धूसर झाले फक्त कोरोना शी लढा हेच तत्त्व काळाने सर्वांना स्वीकारण्यास भाग पाडले .काही ठिकाणी त्याला गालबोट लागले आहेत ती बाजू निराळी आहे व तसेच अपवादात्मक व खालच्या मानसिकतेचे आहे. असा एकजुटीचा अभूतपूर्व क्षण केव्हा-केव्हाच जगाला पहावयास मिळाला ही आपल्यासाठी सकारात्मक बाजू आहे कि,जनता कोरोना विरोधात एकजुटीने लढा देत आहेत.

भारतात को रो ना च्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली.आज तो 3रा टप्पा ओलांडत आहे. काही राज्य वगळता तो 17 मे पर्यंत वाढवण्यात आला.यामुळे अनेक सरकारी निमसरकारी व खाजगी उद्योगधंद्यावर त्याचा परिणाम झाला विमानसेवा रेल्वेसेवा बस सेवा व तसेच खाजगी वाहन सेवा कधी नव्हे,ती या काळात पूर्णपणे बंद करण्याची वेळ देशावर आली.यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले.पोलीस ,डॉक्टर, नर्स व सफाई कामगार वगळता. पण जे खाजगी कंपनीत व उद्योग-धंद्यात कामगार काम करत होते त्यांच्या हाताचे काम यामुळे गेले व जे हातावर पोट जगवत होते त्यांची मात्र उपासमारीची वेळ आली.व बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. याचाच परिणाम म्हणजे काल औरंगाबाद येथे रेल्वेखाली येऊन बळी पडलेले कामगार होय. हे होण्यामागचे कारण म्हणजे शासन व प्रशासन या कामगार व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. याचा परिणाम म्हणजे नाईलाजाने त्या-त्या राज्यातील व जिल्ह्यातील कामगारांनी आपल्या गावाकडे पायी दिंड्या काढाव्या लागल्या यामुळे अनेक ठिकाणी लॉक डाऊन चे नियम धाब्यावर बसवण्यात आले .याचा परिणाम म्हणजे शासनाने पुढचा अनर्थ टाळावा म्हणून मागच्या आठवड्यात लॉक डाऊन मधून थोडीफार शिथिलता देत परप्रांतात व परजिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची व विद्यार्थ्यांची सोय म्हणून घरी  जाऊन देण्याचा निर्णय घेतला तसेच रेल्वे सेवा व बस सेवा अंशतः सुरू केली.कारण संक्रमित लोकांचा आकडा पाहता हा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला ही,सर्वसामान्यांसाठी खूपच सुखद गोष्ट आहे.
सरकार शासन व प्रशासन स्तरावर पाहिजे व शक्य होईल तेवढ्या उपाय योजना करत आहे. आपली जनता प्रति जबाबदारी व कर्तव्य म्हणून शासन या प्रकारचे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण जनतेचेही ही सरकारप्रती काही कर्तव्य आहेत ते जनतेने निभावले पाहिजे जसे की सोशल डिस्टन्स ,गरज असल्यास बाहेर जाणे, पूर्ण सुरक्षितता बाळगणे, कोणी नवीन व्यक्ती आल्यास त्याची माहिती प्रशासनाला देणे व त्यांना सज्जग करणे.विनाकारण गर्दी न करणे हे कर्तव्य जर सर्वसामान्य जनतेने पाळली तर या कोरोना महामारी च्या दहशतवादाला आळा घालण्यास मदत होईल.कारण आपण एका अखंडित राष्ट्राचे कर्तव्यदक्ष नागरिक आहोत.हे लक्षात ठेवून यावर पूर्णपणे अंमलबजावणी करण्याची हीच योग्य वेळ आहे व उपाय योजना आहेत.कारण 'आपणच आपल्या जीवनाचे रक्षक'आहोत हे ब्रीद वाक्य सिद्ध करण्याची हीच वेळ आहे.

         
                  किशोर दाभाडे
            ( सामाजिक अभ्यासक)

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट