
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका केमिकल गोदामाला मोठी आग
- by Adarsh Maharashtra
- May 06, 2020
- 1419 views
भिवंडी: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात करोना विषाणूने थैमान घातले असून करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी करण्यात आली आहे. सगळे व्यापार उद्योग बंद असताना असताना ठाणे जिल्ह्याला हादरुन टाकणारी घटना उघडकीस आली आहे. भिवंडी येथील राहनाळ गावातील एका केमीकल गोदामाला आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आग विझवण्यासाठी सहापेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्याचे समजत आहे. यामुळे मोठी आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत एएनआय वृत्त संस्थेने माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, ही आग कशामुळे लागली, याची कारण अद्याप अजूनही अस्पष्ट आहे.
कोरोना विषाणवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच भिवंडी तालुक्यात एका केमिकल कंपनीला आग लागली आहे. भिवंडी तालुक्यात आग लागत असल्याच्या अनेक घटना सतत आपल्या कानावर पडत आहेत. यामुळे ठाणे शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाली आहे.
याआधी भिवंडी तालुक्यातील भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावातील कांचन कंपाऊंडमधील एका कोमच्या गोदमला ही भीषण आग लागली होती. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा मोठ्या प्रमाणात साठा होता. मात्र, आग लागल्याने संपूर्ण गोदाम जळून खाक झाले होते. तसेच आगीपासून निघणाऱ्या धुरामुळे गावातील नागरिकांना डोळ्यात चुळचुळणे, श्वसनासाठी त्रास सहन करावा लागला होता. भिवंडी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने रात्री उशिराने ही आग विजवण्यात आली होती.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम