संचार बंदीची ऐसी की तैसी !

महाराष्ट्रसह संपूर्ण देश आज करोनाच्या सावटाखाली वावरत आहे. गेल्या चाळीस दिवसाहून अधीक काळापासून करोना विषाणूने साऱ्या जगात थैमान घातले आहे. हजारो लोक यात मृत्यूमुखी पडले आहे आणि पडत आहेत.

          जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेली अमेरिकाही  सुद्धा यातून सुटलेली नाही.एवढे मोठे महाभयंकर संकट या करोना विषाणूमुळे कोसळले आहे.यातून भारताने धडा घ्यावा म्हणून पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री दिवस रात्र डोळ्यात तेल घालून करोनावर मात करण्यासाठी झटत आहे. डॉक्टर, नर्स, आरोग्य अधिकारी,आपल्या परीने रुग्णावर उपचार करीत आहेत. पोलीस घरदार सोडून चोवीस-चोवीस तास रस्त्यावर उभे राहून लोकांना घरातच राहण्याचे आव्हान करीत आहे. पण याचे लोकांना काहीच पडले नाही.

            सुरुवातीला तेरा दिवसाची संचार बंदी असताना लोक बाहेर पडू लागले. बस आणि लोकल चालु राहल्यामुळे लोक घराबाहेर कामानिमित्त पडू लागली परिणामी करोनाबादीत रुग्णाची संख्या वाढू  लागली.लोक भाजीपाला तसेंच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी झुंबड करू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करावा लागला आणि दुर्दैवाने संपूर्ण भारताला 21दिवसाची टाळेबंदी जाहीर करावी लागली. यात सर्व बससेवा, लोकल गाड्या आणि लांबपल्ल्याच्या 21दिवसासाठी बंद कराव्या  लागल्या.तरी सुद्धा लोक आपल्या घरच्या दोन चाकी आणि चार चाकी गाड्या रस्त्यावर घेऊन येऊ लागली.त्यावरीही बंदी आणली असताना काही आंबट शौकीन लोक रस्त्यावर गाड्या घेऊन फिरू लागली.त्याचा परिणाम पोलिसांना त्यांना मार द्यावा लागला.पोलीस गाड्या अडवू लागले म्हणून हेच लोक विनाकारण रस्त्यावर येऊन फिरू लागली.

              सरकार दिवसातून तीन -तीन वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगत आहे की रस्त्यावर फिरू नका घरीच रहा घरच्याची काळजी घ्या तरी सुद्धा लोक याकडे कानाडोळा करीत आहेत.बाजारात चिकन आणि मटण बंद असल्यामुळे भाजीपाला मार्केट मध्ये जनता तुडुंब गर्दी पडू लागली.आपल्याला करोना विषाणूची साखळी तोडायची असेल तर सगळयांना घरीच राहावे लागेल असे सरकार सतत सांगत असताना सुद्धा लोक खरेदीसाठी मार्केट मध्ये गर्दी  करीत आहेत.

            हाताला काम नसल्याने अनेक कामगार घरदार सोडून आपआपल्या गावी मिळेल त्या वाहनाने परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणी चक्क कंटेनर मध्ये गुरासारखे माणसे भरून जात आहेत.स्वतःच्या जीवाची जराही पर्वा न करता लोक जीव मुठीत धरून गावी परतत आहे.दिल्लीमध्ये बसच्या टपावर दाटीवाटीने बसून प्रवासी वाहतूक अजूनही चालूच आहे.मस्जिद मध्ये नमाज पाडण्यासाठी गर्दी होत आहे.संचार बंदी तोडून लोक आपली मनमानी करीत आहेत. त्यांच्या डोळ्यसमोर चीन, इटली आणि अमेरिका इथे रोज शेकडोने लोक करोनाच्या संसर्गाने मरत आहेत हें दिसुन सुद्धा भारतातल्या सुसंस्कृत लोक याकडे कानाडोळा करीत आहेत.

             सध्या आपण दुसऱ्या स्टेज मध्ये आहोत हा करोना तिसऱ्या स्टेजमध्ये जाऊ नये याची काळजी करायला हवी.पण जनता या संचार बंदीचा गैर फायदा घेत आहेत. काही टवाळकी पोलिसांना नाहक त्रास देण्यासाठी रस्त्यावर मोकाट फिरत आहेत त्यांना आवरायला हवे. डॉक्टर, नर्स, आरोग्य अधिकारी, पोलीस सह देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, पालिका अधिकारी जीव तोडून जनतेच्या संरक्षणासाठी लागले असताना, जनतेनेच या संचार बंदीची ऐसी की तैसी करून ठेवली आहे. 





रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट