चारही दोषींना फाशी

सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर आता आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल,' अशी भावनिक प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली. दरम्यान, सारे पर्याय संपूनही ही फाशी टाळण्यासाठी दोषींच्या वकिलांचे प्रयत्न सुरूच होते. आरोपींनी विविध न्यायालयात केलेल्या याचिका गुरुवारी सायंकाळी फेटाळण्यात आल्या.

नवी दिल्ली(प्रतिनिधी): दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील नराधमांना अखेर फासावर लटकवण्यात आले. या नराधमांना फाशी झाल्याने निर्भयाला अखेर न्याय मिळाला. गेली सात वर्ष देशातील जनता या फाशीची आतुरतेने वाट पाहत होती, कारण ६ डिसेंबर २०१२ रोजी या नराधमांनी जे कृत्य केले होते त्याने मानवताही कलंकित झाली होती. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपुर्ण देश हादरुन गेला होता. निर्भया बलात्कार व हत्याकांड जगभरात चर्चिले गेले होते. भारतात २०१२ पासून सुरु असलेल्या या प्रकरणात अनेक उलथापालथी झाल्या.  न्यायालयाने फाशीची शिक्षा सुणावूनही दोषींनी कायद्याच्या पळवाटा शोधून फाशी लांबवली. फाशी लांबवण्यासाठी दोषींनी सर्व कायदेशीर पर्यायाचा वापर केला. अनेकवेळा या दोषींना खरोखर फाशी होणार की यांना कायदेशीर पळवाटे मुळे फायदा होणार असा प्रश्न पडावा , अशी परिस्थिती निर्माण झाली. दोषींना फाशी देण्याच्या तारखा वारंवार बदलण्यात आल्या. फाशी लांबवण्याचे आपले सर्व पर्याय संपले आता आपल्याला फाशी होणारच हे लक्षात आल्यावर फाशी पासून वाचण्यासाठी  शेवटचा  प्रयत्न म्हणून दोषींनी  आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावले.  दोषींनी फाशी टाळण्याचे सर्व प्रयत्न करुनही काही उपयोग झाला नाही अखेर त्यांना  यमसदनी जावेच लागले. उशिरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला इतकेच आपण म्हणू शकतो. अर्थात याला न्याय म्हणावा का? असाही प्रश्न पडतो कारण न्यायला विलंब हा देखील अन्यायच असतो. निर्भयावर जिवंतपणी तर खूप अन्याय झाला मृत्यूनंतरही तिला न्यायासाठी झटावे लागले. जलद गती न्यायालयात हा खटला चालवूनही दोषींच्या  शिक्षेची अंमलबजावणी होण्यास सात वर्ष, तीन महिने, तीन दिवस इतका मोठा कालावधी लागणे हे आपल्या न्यायव्यवस्थेस शोभनिय नाही. या निमित्ताने आपल्या न्यायव्यवस्थेतील  मोठी त्रुटी जगासमोर आली.  आता पुन्हा आपल्या देशात प्रत्येक स्त्री खऱ्या अर्थाने निर्भयपणे वावरु शकेल अशी परिस्थिती निर्माण होणे आवश्यक आहे. पुन्हा अशी निर्भया प्रकरणे होऊ नयेत, यासाठी काळजी घ्यायला हवी. तसेच न्यायला विलंब होऊ नये यासाठीही न्यायव्यवस्थेत तरतूद करावी

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट