
तुमच्या फोनद्वारे कोरोनाची लागण होऊ शकते, म्हणून सतत स्वच्छ करा मोबाईल फोन
- by Adarsh Maharashtra
- Mar 16, 2020
- 662 views
नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र घाबरुन न जाता काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या हातात दिवसभर असणाऱ्या मोबाईलवरही कोरोनाचा विषाणू बसू शकतो. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो.
स्मार्टफोनमधून व्हायरस पसरतो
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरस कोठूनही लोकांमध्ये पसरू शकतो. एका अहवालानुसार आपण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला वारंवार स्पर्श केल्यास आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात नीट धुतले पाहिजे. कारण, आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरुनही,कोरोना व्हायरस आपल्यामध्ये प्रवेश करू शकतो. कोरोना विषाणू सुमारे १ आठवड्यापर्यंत निर्जीव पृष्ठभागावर जगू शकतात. तसेच, ते कफ किंवा शिंकाच्या स्वरूपात मानवी शरीरातून बाहेर येते. विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका म्हणजे संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधणे.
दर दीड तासांनी आपला फोन साफ करास्मार्टफोनमधून व्हायरस कसे दूर करावे?
तज्ज्ञांचा विश्वास आहे की, अल्कोहोलने मोबाईल स्वच्छ केल्यास व्हायर दूर होऊ शकतो. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम