
सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला; सत्ता संघर्षातील सस्पेन्स कायम
- by Adarsh Maharashtra
- Nov 25, 2019
- 758 views
दिल्ली- महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या याचिकेवरील सुनवाई पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आज सकाळी १०.३० वाजता न्यायालय निकाल जाहीर करणार असल्याने सत्तासंघर्षातील सस्पेन्स कायम आहे.
रविवारी महा आघाडीच्या याचिकेवरील सुनवाईत सरकारी वकील रोहतगी आणि महाधिवक्ता मेहता यांनी सरकारची बाजू मांडली तर महाआघाडीच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू संघवी यांनी युक्तिवाद करताना भाजपने अजितदादा आणि राज्यपालांना हाताशी धरून कशा प्रकारे बेकायदेशीर सरकार बनवले याची माहिती देऊन तात्काळ फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी केली होती तर सरकारच्या बाजूने युक्तिवाद करताना रोहतगी यांनी सांगितले की विधी मंडळाच्या निर्णय प्रक्रियेत न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही तसेच राज्यपाल आपल्या विशेष अधिकारात सरकार बनवण्याची अनुमती देऊ शकतात दोन्ही कडच्या युक्तिवाद ऐकून न्यायालयाने केंद्र सरकार,राज्य सरकार,आणि फडणवीस व अजितदादा यांना नोटीस बजावून राज्यपालांचे पत्र तसेच ज्या आमदारांचा पाठींबा आहे त्यांचे पत्र सादर करायला सांगितले तसेच महाआघाडीलाही त्यांना पाठींबा असलेल्या आमदारांची पत्रे सादर करायला सांगितली होती. त्यानुसार दोन्ही पक्षकारांना आपापली कागदपत्रे काल न्यायालयात सादर केली यावेळी मुकुल रोहतगी यांनी आणखी वेळ मागितला पण न्यायालयाने नकार दिला आणि या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आज न्यायालय निकाल देणार आहे त्यात फ्लोअर टेस्ट कधी घेण्याचे आदेश आहेत याबाबतचीच मोठी उत्सुकता आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम