
महाराष्ट्राचे शरद बोबडे होणार देशाचे नवे सरन्यायाधीश
- by Adarsh Maharashtra
- Oct 18, 2019
- 814 views
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ न्यायाधीश एस. ए. बोबडे हे देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली आहे. बोबडे हे देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून १८ नोव्हेंबरला शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशाच्या नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्याचवेळी त्यांनी देशाच्या नव्या सरन्यायाधीशांचं नाव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं समजतं. गोगोई यांनी न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. तसं पत्र त्यांनी कायदा मंत्रालयाकडे पाठवलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजते. बोबडे हे महाराष्ट्रातील नागपूरचे आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली केली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाचे ते न्यायमूर्ती होते. या. बोबडे यांचा रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या घटनापीठात समावेश आहे. याशिवाय त्यांनी अनेक महत्वाच्या खटल्यांचे कामकाज पाहिले आहे. सुप्रीम कोर्टानं आधार कार्डसंबंधी खटल्यात जो आदेश दिला होता, त्या खंडपीठात बोबडे यांचा समावेश होता. आधार्ड कार्डाशिवाय कोणताही भारतीय नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहू शकत नाही, अशी टिप्पणी या खटल्यात सुप्रीम कोर्टानं केली होती.
कोण आहेत न्या. शरद बोबडे?
न्या. शरद बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ साली महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झाला.
नागपूर विद्यापीठातून बी.ए. आणि एलएलबी शिक्षण घेतलं आहे.
१९७८मध्ये न्या. बोबडे यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये सहभागी झाले.
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी वकिली केली.
२००० साली त्यांनी हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
त्यानंतर मध्य प्रदेश हायकोर्टाचे ते न्यायमूर्ती झाले.
२०१३मध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची सुप्रीम कोर्टात नियुक्ती झाली. बोबडे हे २३ एप्रिल २०२१ रोजी निवृत्त होतील.
१८ नोव्हेंबरला बोबडे हे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम