
निवडणुकीतील जातीची समीकरणे
जातीयवाद, प्रांतवाद, भाषावाद हे सगळे वाद देशाच्या एकात्मता आणि अखंडतेसाठी घटक आहेत असे सांगितले जाते. पण राजकीय पक्षांकडूनच हे असले वाद निर्माण केले जातात आणि निवडणूक काळामध्ये तर अशा जातीयवादामुळे समाजात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते. सध्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू झाली आहे. पण तिकीट वाटपा पासून प्रचार करण्यापर्यंत अनेक ठिकाणी जातीचे राजकारण बघायला मिळते आहे. वंचित बहुजन आघाडीने तर आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करताना उमेदवाराच्या नावापुढे त्याच्या जातीचा उल्लेख केला आहे. त्याच बरोबर एखाद्या मतदार संघात तिकीट देताना त्या मतदार संघात कोणत्या जातीचे अधिक प्राबल्य आहे याचा अंदाज घेऊनच त्या जातीच्या उमेदवाराला तिकीट दिले जाते. मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघात कोण कुठला सिद्धेश्वर महाराज ज्याचे नावही कधी ऐकले नव्हते अशा माणसाला भाजपने तिकीट दिले. कारण त्या मतदार संघात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे आणि सिद्धेश्वर महाराज हा लिंगायत समाजाचा बाबा आहे. म्हणून त्याला तिकीट दिले आणि तो निवडून आला. लोकही जातीसाठी माती खाणारे असतात त्यामुळे एखाद्या मतदार संघात एखाद्या विशिष्ट जातीचे प्राबल्य असेल तर ती जागा जिंकण्यासाठी त्याच जातीतल्या माणसाला उभे केले जाते. मग तो चोर असो, डाकू असो, खुनी असो की बलात्कारी असो लोक जातीच्या नावाखाली त्याच माणसाला निवडून देतात. त्यामुळे आजकाल संसदेत किंवा विधी मंडळात चांगले चारित्र्यवान आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेले लोक दिसत नाहीत. उद्या आसाराम बापूच्या विरोधात अण्णा हजारेंना उभे केले तर आसाराम बापू निवडून येईल आणि अण्णांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती या देशात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली. तरीही अजून लोक जातीधर्माच्या प्रभावाखाली वावरत आहेत, आस्थेच्या नावाखाली चुकीच्या लोकांच्या नादाला लागून आपले नुकसान करून घेत आहेत. सध्या कोथरूड मतदार संघाचा वाद असाच गाजतोय या मतदार संघातून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याला कोथरूड मधल्या बामणांनी विरोध केला आहे. काय तर म्हणे चंद्रकांतदादा मराठा आहेत आणि कोथरूड मतदार संघात ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आहे. २०१४ साली येथून मेधा कुलकर्णी या ब्राह्मण उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडून गेल्या होत्या पण यावेळी चंद्रकांतदादांसाठी त्यांचे तिकीट कापण्यात येणार आहेत. त्यामुळे कोथरूड मधले सगळे बामण चिडलेत आणि त्यांनी चंद्रकांतदादांना पाडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सगळ्या जातीधर्माच्या लोकांना आपल्या सोबत घेऊन घुसखोर मुस्लिम राज्यकर्त्यांचा मुकाबला केला होता म्हणून महाराष्ट्र वाचला. अन्यथा महाराष्ट्रावर भगव्या ऐवजी हिरवा चांदतारा फडकताना दिसला असता. शिवाजी महाराज आणि त्यांच्या लाखो मराठी मावळ्यांचे बलिदान बामण विसरले का? शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. उलट आपल्या अष्टप्रधान मंडळात त्यांनी मोरोपंत पिंगळे, रामचंद्र पंडित, रघुनाथराव पंडित ,अनाजीपंत या सारख्या ब्राह्मणांना मानाचे स्थान दिले. मात्र ज्या शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली त्याच ब्राह्मण समाजाने शिवाजी महाराजांना तुच्छ मानून त्यांच्या राज्यभिषेकाला विरोध केला. शिवाजी महाराजांच्या वंशजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद रयतेच्या कल्याणासाठी दिले होते. पण पेशव्यांच्या पुढच्या पिढीने दलित मागासवर्गीयां जिने हराम केले होते. त्यांच्या गळ्यात मडके बांधून कमरेला झाडू लावून त्यांना त्यांच्या सवलीचाही अधिकार नाकारला होता. या देशातील गोरगरीब, दलित आणि आदिवासींना इतकी वाईट वागणूक मोघल किंवा इंग्रजांनीही दिली नव्हती. इतकी वाईट वागणूक पेशव्यांनी दिली आणि आज तेच पेशवाईचे वारसदार मराठा चंद्रकांतदादांना विरोध करून पुण्यातून अजून पेशवाई संपलेली नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज जे आमचे मराठा बांधव भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन नरेंद्र आणि देवेंद्रच उदोउदो करीत आहेत. त्यांनी जरा शिवशाहीचा इतिहास तपासून पहावा आणि त्या इतिहासात मराठ्यांना कशाप्रकारे कोणी वेदना दिल्या ते एकदा नजरेखालून घालावे म्हणजे त्यांना आपण कोणाच्या मागे धावतोय हे कळेल. केवळ दलितच नव्हेत तर मराठ्यांनाही उच्चवर्णीय बामन लोकांनी त्रास दिला आहे. संभाजी महाराजांशी गद्दारी करून अर्धे स्वराज्य मोघलांना द्यायला निघालेल्या अनाजीपंताचे वारसदार आजही या महाराष्ट्रात जिवंत आहेत. त्यामुळे त्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राचे नुकसान करू नका सगळेच बामन काही वाईट किंवा जातीयवादी आहेत असे कुणीही म्हणणार नाही. पण जे चंद्रकांत दादांना मराठा म्हणून विरोध करतात त्यांच्यापासून सावध राहणे ही काळाची गरज आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम