
भिवंडी भूषण रंगराव पवार याना श्रद्धांजली म्हणून मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी २५ टँकर ...
- by Adarsh Maharashtra
- May 16, 2019
- 837 views
भिवंडी (प्रतिनिधी) शहरातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे भिवंडी भूषण रंगराव विठोबा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील ग्रामीण जनतेची तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे २५ टँकर उपलब्ध करून देऊन ख-या अर्थाने त्यांच्या कार्यास आदरांजली कुटुंबीयांनी अर्पण केली असल्याची भावना राज्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली , ते भिवंडी येथे रंगराव विठोबा पवार यांच्या शोकसभेत बोलत होते . याप्रसंगी खासदार कपिल पाटील , आमदार रुपेश म्हात्रे, महेश चौघुले , भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थळे , महाएडव चौघुले , अँड प्रमोद पाटील , बबनराव कडभाने ,भाजपा गटनेता निलेश चौधरी , माजी महापौर तुषार चौधरी , नगरसेवक प्रशांत लाड , सुमित पाटील , सभापती अशोक भोसले यांसह सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील असंख्य हितचिंतकां सह रंगराव पवार यांचे चिरंजीव साईनाथ पवार , दीपक पवार व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अर्जुन खोतकर यांनी रंगराव पवार यांच्या बद्दल भावना व्यक्त करताना जगायचं कसे हे काही थोड्या लोकांना कळत त्यापैकी पवारशेठ एक असल्याने त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबतच समाजासमोर एक आदर्श घालून दिला होता त्यामुळे त्यांची पोकळी सदैव जाणवत राहील परंतु त्यांच्या स्मृती चिरठायी ठेवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय हा वारसा नक्कीच पुढे चालवतील असा आशावाद व्यक्त केला . तर खासदार कपिल पाटील यांनी पवार शेठ यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रवास उलगडून दाखवताना त्यांनी केलेल्या सामाजिक , शैक्षणिक , सहकार व धार्मिक कार्याचा उल्लेख करीत पूर्वीच्या काली माणसांवर प्रेम करीत असताना पैसा वापरला जायचा आजच्या काळात पैशांवर प्रेम करताना मांस वापरली जातात परंतु पवारशेठ त्यास अपवाद ठरत त्यांनी सदैव माणसांवर प्रेम करीत असताना पैशाला दुय्यम स्थान दिल असल्याचे सांगत त्यांचा जीवनप्रवास येणा-या पिढीला सदैव प्रेरणा देत राहील असे सांगितले .पवारशेठ यांनी ज्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात काही केले त्या समाजाने अशा दुःखद प्रसंगात पवार कुटुंबियांच्या मागे खंबीर पणे उभे राहणे गरजेचे असून त्यांच्या स्मृती भिवंडीकरांनी जपणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार महेश चौघुले यांनी केले तर संतोष शेट्टी यांनी पवारशेठ यांनी समाजाला व्यक्तीला मदत करताना कधी ही स्वतःचा स्वार्थ बघितला नव्हता त्यामुळेच त्यांचे दातृत्वशीलता ही सर्वाना भावली असे सांगितले . माणूस किती जगला याला महत्व नसते तर तो कसा जगला हे महत्वाचे असते त्यासाठी संकटकाळी धावून येणार हा ईश्वराचा दूत असतो तत्या भूमिकेत पवारशेठ नेहमी वावरले असे शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थळे यांनी सांगत शहरातील व तालुक्यातील असंख्य मंदिर उभारण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता असे सांगत समाजाची काळजी घेताना स्वतःची इमारत नारपोली पोलीस ठाण्यास विनामूल्य देण्याचे धैर्य त्यांच्यात होत असे सांगत श्रद्धांजली अर्पण केली .
याप्रसंगी महादेव चौघुले , अँड प्रमोद पाटील , निलेश चौधरी ,माजी नगरसेक गजानन शेटे , पांडुरंग गोराडकर ,कमलाकर पाटील , अरुण पाटील , यांची सुध्या पवारशेठ यांच्या आठवणींना उजाळा दिला .या शोकसभे प्रसंगी कुटुंबीयांतर्फे कृतज्ञता व्यक्त करताना साईनाथ पवार यांनी आमच्या वडिलांनी दिले संस्कार आम्हाला सदैव प्रेम देत असताना समाजाचे प्रेम आम्हाला निरंतर मिळत राहो अशी भावना व्यक्त केली .
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम