
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाची घोषणा; महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार मतदान
महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच ११, १८, २३ आणि २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली.
- by Adarsh Maharashtra
- Mar 10, 2019
- 824 views
निवडणूक आयोगाकडून देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीचा पहिल्या टप्प्याला ११ एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे पर्यंत मतदान पार पडणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत औपचारिक माहिती देण्यात आली. या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली. तारखांसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विविध मतदार संघ, राज्यांचे दौरे केले. शाळा, महाविद्यालयांच्या आणि बोर्डाच्या परीक्षा, सुट्ट्या, उत्सव या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. असेही मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. सोबतच, मतदारांना यावेळी नोटाचा अधिकार सुद्धा वापरता येईल.महाराष्ट्रात ४ टप्प्यांत, अशा आहेत मतदानाच्या तारखा पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल, पाचव्या टप्प्यातील मतदान ६ मे, सहाव्या टप्प्यातील मतदान १२ मे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी पार पडणार आहे. यानंतर २३ मे रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येतील.
महाराष्ट्रात ४ टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत.
- प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर,
- सोशल मीडिया, पेड न्यूजवर करडी नजर
- ९० कोटी लोक बजावणार मतदानाचा अधिकार
- दीड कोटी मतदारांचे वय १८- १९ वर्षे, १.६० कोटी नोकरीपेशा मतदार
- १० लाख पोलिंग स्टेशन वापरले जातील
- मतदानाच्या ४८ तासांपूर्वी बंद होणार लाउडस्पीकर , रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाउडस्पीकरवर बंदी
- अधिक माहितीसाठी आयोगाकडून १९५० हेल्पलाइन - आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई
- मतदारांना नोटा अधिकार वापरता येणार
- तक्रार नोंदवण्यासाठी Android App, १०० तासांत उत्तर देतील अधिकारी
- ईव्हीएमच्या हालचालींवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिमने नजर ठेवणार
- संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची, मतदानाची व्हिडिओग्राफी
- निवडणुकीत मीडियाची सकारात्मक भूमिका, पेड न्यूज विरोधात सक्त कारवाई केली जाणार
- सोशल मीडिया पोस्टवर सुद्धा निवडणूक आयोगाची करडी नजर
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम