जनता दल सेक्युलर ठाणे जिल्हा व ठाणे शहराच्या वतीने २५ जून माजी प्रधानमंत्री मा. विश्वनाथ प्रताप सिंग यांची जयंती साजरी

ठाणे :राष्ट्रीय अध्यक्ष , माजी प्रधानमंत्री मा. आदरणीय मा. एच. डी. देवेगौडा यांच्या आदेशानुसार  महाराष्ट्र अध्यक्ष मा. शरद पाटील  यांच्या मार्गर्शनाखाली माजी पंतप्रधान मा. विश्वनाथ प्रताप सिंग यांची जयंती दि. २५ जून रोजी साजरी करत आहे जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे माहीती देत असताना सांगितले की, माजी प्रधानमंत्री सिंग यांनी देशातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, इतर मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याकांसाठी  अतिशय मोलाचे कार्य केलेले आहे.


देशातील शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वप्रथम यांनी घेतला होता. त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यामुळे देशातील ओबीसीना चेहरा व  नवचैतन्य मिळालेले आहे.


व्ही. पी. सिंग हीच खरी जनता दलाची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा बहुजन समाजाला विचारांची प्रेरणा मिळावी याउद्देशने ठाणे शहरातील आदिवासी भाग येऊर  याठिकाणी केंद्र सरकारच्या कायद्याचे काटेकोर पालन करून कोव्हिड १९ प्रादुर्भाव संरक्षणासाठी तेथील गरजू मुल व महिला एकूण १५० लोकांना मास्क व खाऊ वाटप कार्यक्रमात उपस्थित पाहुणे केंद्रीय मानवाधिकार ठाणे शहरअध्यक्ष मा पुरुषोत्तम भट्ट, उपाध्यक्ष मा.श्रीमती मनीषा पटेल सामाजिक कार्यकर्ता संजय मेढेकर, पत्रकार चंद्रकांत वाघमारे,तसेच पदाधिकारी ठाणे शहर अध्यक्ष सुनील विश्वकर्मा, मधुकर मोरे, अनिल शेटगे, अनिल गिरी, सूरज शेटगे, प्रकाश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पर्यावराला पोषक सहभाग व्हावा म्हणून वृक्षारोपण फॉरेस्ट भागात आंबा, फणस, पिंपळ, चिंच, बदाम याप्रक्रची झाडे लावून जयंती निम्मित समाजाला आदर्श घालून देण्याचे काम जनता दल सेक्युलरच्या वतीने केले आहे. शेवटी शहर अध्यक्ष सुनील विश्वकर्मा यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट