
मुंबईत जागतिक भागिदारी परिषद १२-१३ जानेवारीला
· उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन · ४० राज्यातील सुमारे १ हजार प्रतिनिधींची उपस्थिती · केंद्र शासन, राज्य शासन आणि कॉन्फीडरेशन ऑफ इन्डस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक परिषद. मुंबईला प्रथमच आयोजकाचा मान · केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा
- by Adarsh Maharashtra
- Jan 06, 2019
- 936 views
मुंबई, दि. ५ : येत्या १२ आणि १३ जानेवारी रोजी येथील जे डब्ल्यू मेरियेट हॉटेलमध्ये जगातील सुमारे ४० देशातील उद्योजक एकत्र येणार आहेत. केंद्र शासन, राज्य शासन आणि कॉन्फीडरेशन ऑफ इन्डस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागिदारी परिषद आयोजीत करण्यात आली आहे. २५ वर्षात मुंबईला प्रथमच आयोजक होण्याचा मान मिळाला आहे. या परिषदेचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
यावेळी श्री. देसाई म्हणाले, या जागतिक परिषदेचे आयोजक होण्याचा मान राज्याला मिळाला ही आनंदाची बाब आहे. यापूर्वी झालेल्या मेक इन इंडीया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. या परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यातील उद्योगांना चालना मिळाली आहे. आगामी परिषदेसाठी देखील राज्य सज्ज असून ही परिषद सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होइल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. प्रभू म्हणाले, महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. देशाने येत्या काही वर्षात १०० बिलीयन डॉलर्सची परकीय गुंतवणूक आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. इज ऑफ डुईंग बिजनेस साठी देश किंवा राज्य घटक न मानता जिल्हा घटक मानून नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यांचा विकास करून पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे. देशाची अर्थव्यवस्था ट्रिलीयन डॉलर कडे वाटचाल करीत आहे. यासाठी उत्पादन,सेवा, कृषी, पर्यटन आणि निर्यात यासारख्या क्षेत्राच्या वाढीसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व प्रयत्नांची चर्चा आणि प्रदर्शन हे या जागतिक भागिदारी परिषदेत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉन्फीडरेशन ऑफ इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष चंद्रजीत बॅनर्जी यांनी या परिषदेची रूपरेषा आणि पार्श्वभूमी सांगितली. तसेच परिषद यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम