
मनपा 'बी' विभागातील धूर्त लबाड 'कोल्ह्यावर' कारवाही कधी?
- by Adarsh Maharashtra
- Dec 20, 2018
- 1323 views
मुंबई: घरात पाळलेले एखादे जनावर देखील मालकासोबत बेईमानी करीत नाही. परंतु मुंबईकरांच्या कररुपी पैशांमुळे पगार घेत असलेला हा धूर्त लबाड' कोल्हे' मात्र जनतेशी बेईमानी करीत आहे. आणि या धूर्त कोल्ह्याला पाठीशी घालणारे सहा आयुक्त आणि उपायुक्त हे देखील मुंबईकर कर धारकांची एक प्रकारे फसवणूकच करीत आहेत.
या धूर्त कोल्ह्याचे प्रताप पुढीलप्रमाणे
वाडीबंदर ब्रिज एस.व्ही.पी रोडच्या दुतर्फ़ा फुटपाथवर वाळू, खडी, रेती. पाईप इत्यादी बांधकाम साहित्य ठेवून एम.इ.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणास अतुल कोल्हेंचा आशीर्वाद आहे असे कंपनीच्या कामगारांनी आदर्श महाराष्ट्रशी बोलताना सांगितले होते. यावर २९ नोव्हेंबर १८ रोजी द.आदर्श महाराष्ट्र्रने 'अतुल कोल्हे'च्या आशीर्वादाने झाले फुटपाथचे झाले गोडाऊन या मथळ्याखाली बातमी केली होती. परंतु सह आयुक्त विवेक राही यांनी यावर अद्दाप कोणतेही ठोस कारवाही केलेली नाही.
वाडीबंदर-दाणाबंदर परिसरातील लीलाधर लखमशी मार्ग लीलावती सदन इमारतीत असलेला 'पंचतारा बार' याने महापालिकेची संपूर्ण फूटपाथ गिळंकृत केली आहे. तसेच देवाजी रतनशी मार्ग, इंडियन सिमेन्स होम येथील दुतर्फ़ा फुटपाथवरती हॉटेल, धाबे, भटारखाने, मंडप बांधून फुटपाथवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. यावरही दै. आदर्श महाराष्ट्रने दि. १३ डिसेम्बर १८ रोजी या प्रकरणावर बातमी प्रकाशित केली होती. महापालिकेची फुटपाथ मुबईकरांच्या चालण्यासाठी असताना काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगमनातने मुंबईकरांना नसता मनस्ताप भोगावा लागत आहे. महापालिकेचा गलेगठ्ठ पगार असताना कोल्हे सारखा अधिकारी महापालिका आणि जनतेचा विश्वास घात करीत आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे मुंबई महापालिकेची बदनामी होत आहे. यासाठी मुंबई महापालिकेने अशा कामचुकार अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे, जेणे करून इतर अधिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण होऊन ते कर्तव्याशी कसूर करण्यास धजावणार नाहीत. या प्रकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा दै.आदर्श महाराष्ट्र सातत्याने करीत आहे. या प्रकरणावर अनेकदा वृत्त प्रकशित करून देखील एकमेकांशी संगनमत असलेले निगरगट्ट अधिकारी साळसूदपणे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु दै. आदर्श महाराष्ट्र अशा अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत याचा पाठपुरावा सातत्याने करीत राहील.
वाडीबंदर ब्रिज एस.व्ही.पी रोडच्या दुतर्फ़ा फुटपाथवर वाळू, खडी, रेती. पाईप इत्यादी बांधकाम साहित्य ठेवून एम.इ.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणास अतुल कोल्हेंचा आशीर्वाद आहे असे कंपनीच्या कामगारांनी आदर्श महाराष्ट्रशी बोलताना सांगितले होते. यावर २९ नोव्हेंबर १८ रोजी द.आदर्श महाराष्ट्र्रने 'अतुल कोल्हे'च्या आशीर्वादाने झाले फुटपाथचे झाले गोडाऊन या मथळ्याखाली बातमी केली होती. परंतु सह आयुक्त विवेक राही यांनी यावर अद्दाप कोणतेही ठोस कारवाही केलेली नाही.
वाडीबंदर-दाणाबंदर परिसरातील लीलाधर लखमशी मार्ग लीलावती सदन इमारतीत असलेला 'पंचतारा बार' याने महापालिकेची संपूर्ण फूटपाथ गिळंकृत केली आहे. तसेच देवाजी रतनशी मार्ग, इंडियन सिमेन्स होम येथील दुतर्फ़ा फुटपाथवरती हॉटेल, धाबे, भटारखाने, मंडप बांधून फुटपाथवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. यावरही दै. आदर्श महाराष्ट्रने दि. १३ डिसेम्बर १८ रोजी या प्रकरणावर बातमी प्रकाशित केली होती. महापालिकेची फुटपाथ मुबईकरांच्या चालण्यासाठी असताना काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगमनातने मुंबईकरांना नसता मनस्ताप भोगावा लागत आहे. महापालिकेचा गलेगठ्ठ पगार असताना कोल्हे सारखा अधिकारी महापालिका आणि जनतेचा विश्वास घात करीत आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे मुंबई महापालिकेची बदनामी होत आहे. यासाठी मुंबई महापालिकेने अशा कामचुकार अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे, जेणे करून इतर अधिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण होऊन ते कर्तव्याशी कसूर करण्यास धजावणार नाहीत. या प्रकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा दै.आदर्श महाराष्ट्र सातत्याने करीत आहे. या प्रकरणावर अनेकदा वृत्त प्रकशित करून देखील एकमेकांशी संगनमत असलेले निगरगट्ट अधिकारी साळसूदपणे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु दै. आदर्श महाराष्ट्र अशा अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत याचा पाठपुरावा सातत्याने करीत राहील.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम