
'शिवतरे' जोमात, पायधुनीची वाहतूक कोमात; बेकायदा पार्किंग माफियांवर 'पायधुनी वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिवतरेंचा' वरदहस्त
- by Adarsh Maharashtra
- Dec 19, 2018
- 1415 views
मुंबई(प्रतिनिधी): मुंबई वाडीबंदर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिवाजी शिवतरे यांना आलाय ट्राफिक नियंत्रण करण्याचा कंटाळा. त्यामुळे वाडीबंदर येथील ट्राफिक दिवसेंदिवस त्रासदायक ठरत वाहतूक संकटात आली असून 'शिवतरे जोमात आणि वाहतूक कोमात' अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यासंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेली कित्येक वर्ष मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच विभागात कर्तव्यावर राहिल्यानंतर पोलिस निरीक्षक शिवतरे यांची वाहतूक पोलिस विभागात बदली करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी त्यांची बदली वाहतूक पोलीस शाखेत वाडीबंदर येथे निरीक्षक म्हणून करण्यात आली. सद्यस्थितीत 'अनधिकृत पार्किंग'च्या मुद्यावर स्थानिक जनता त्रस्त असूनही मस्तावलेले पोलीस निरीक्षक शिवतरे आपल्या कर्तव्यात कसूर करताना प्रत्यक्ष दिसून येत आहेत. यासंदर्भात ताजी उदाहरणे द्यायची झाल्यास विविध उदाहरणे देता येतील. १) ठाणा स्ट्रीट येथे इंडियन सिमेंन्स हॉस्टेलच्या दोन्ही बाजूला कार आणि फोरक्लिपची बेकायदा पार्किंग दुतर्फा होत असून याचा आर्थिक मोबदला पायधुनी वाहतूक शाखेकडे जात आहे अशी सूत्रांची माहिती आहे. २) वाडीबंदर बस स्टॉपवर पायधुनी वाहतूक शाखेने टोईंग केलेल्या गाड्या पार्किंग केल्या आहेत . यामुळे बस प्रवासी, तसेच बाजूच्या पोलीस वसाहत आणि अग्निशमन दलाच्या वसाहती आहेत. तेथील लोकांना याचा नाहक त्रास होत आहे. 3)चिंचबंदर येथील विविध गल्ल्यांमधील विशेषतः केशवजी नाईक रोड वरील एस टी महामंडळ बिल्डिंग ते सरस्वती सदन पर्यंत ट्रिपल पार्किंग असते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. ओपी क्र -१६९, एल्फिस्टन इस्टेट, दाणाबंदर, क्लाइव्ह रोड येथील आदर्श ट्रान्सपोर्ट को.गोडाऊन क्र. १८ येथे भंगार अवस्थेत दोन ट्रक उभे असून त्यामुळे सदर ठिकाणी झालेल्या दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे आणि कचऱ्याच्या गलिच्छपणामुळे मलेरिया, डेंग्यू सारखे आजार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे महापालिका 'बी' विभागाने ते भंगार अवस्थेतील ट्रक तात्काळ काढण्यात यावे असे दिनांक ९/११/१७ रोजी पत्र वाहतूक शाखेला दिले होते परंतु त्यावर पायधुनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिवतरे यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, ही कारवाई का केली नाही? यासंदर्भात आदर्श महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी शिवतारे यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेली चमत्कारिक उत्तरे म्हणजे मी क्राईम ब्रांचमध्ये कित्येक वर्षे काम केलेले आहे मला येथे काम करण्याचा कंटाळा येतो. वाहतूक शिस्तीत आणणे फारच जिकरीचे असून मला ते जमत नाही, शिवाय माझ्याकडे स्टाफ कमी आहे. पोलीस शिपाई तसेच अधिकारी वर्ग यांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे येथे चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारे वाहतूक सेवा देणे, नियमन करणे या गोष्टी करण्यास फार मोठ्या अडचणी येत आहेत. केशवजी नाईक रोडवर ट्रिपल पार्किंग करण्यात आलेली आहे. यामागे कोणाचे हात आहेत? ही पार्किंग कोणाच्या आशीर्वादाने करण्यात येत आहे? या प्रश्नांची उत्तरे शिवतरे देऊ शकले नाहीत. मस्जिद बंदर,दाना बंदर, वाडीबंदर येथे सामानाच्या अनलोडींग करिता बंदी असतानाही चायना वरून आलेले ४० फुटी कंटेनर येथे का येतात? कसे येतात? या प्रश्नांवरही शिवतरे मूग गिळून गप्प का आहेत? या प्रकरणावर दै. आदर्श महाराष्ट्रने वृत्त प्रसारित केले होते, परंतु निगरगट्ट शिवतरे यांनी स्वतःची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. कंटेनर आणि या बेकायदा पार्किंग वाहतूक शाखेच्या अंतर्गत येते, परंतु शिवतरे सारखे कामचुकार अधिकारी स्वतःची जबादारी स्थानिक पोलिसांवर टाकून मोकळे झाले. अशा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर वाहतूक सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार काय कारवाही करतील असा प्रश्न सर्वसामान्य जनता करीत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम