
संभाजी भिडेंसह आयोजकांवर गुन्हा नोंद करा- भीम आर्मीची मागणी
- by Adarsh Maharashtra
- Dec 17, 2018
- 772 views
मुंबई- विनापरवाना कार्यक्रम घेऊन मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था तसेच समाजाच्या भावना दुखावण्यास/ बिघडविण्यास कारणीभूत असलेले संभाजी भिडे यांच्या सह आयोजक तसेच बारादेवी महानगरपालिका शाळा उपलब्ध करून देणारे शिवडी विभागातील सहाय्यक पालिका आयुक्त ,शाळेचे मुख्याध्यापक यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी या सामाजैक संघटनेने केली आहे या मागणीचे निवेदन भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल रात्री उशिरा मुंबई शहर परीमंडळ 4 च्या पोलीस उप आयुक्त (DCP) एन अंबिका यांना दिले.याप्रकरणी लवकरच न्यायालयात आव्हान देण्यात येईल असा ईशाराही कांबळे यांनी यावेळी दिला.
वादग्रस्त संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम लालबाग येथील गणेश गल्लीत आयोजित करण्यात आला होता. मात्र भीम आर्मीसाह विविध संघटनांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारींचे निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी लालबाग येथील भिडेंच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली होतो मात्र लालबाग येथील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर आयोजक श्री शिवप्रतिष्ठानने हाच कार्यक्रम अत्यंत गुप्तपणे शिवडी पश्चिम बारादेवी येथील महानगरपालिकेच्या शाळेत आयोजित केला . या कार्यक्रमाची माहिती भीम आर्मीसह सामाजिक संघटनांना मिळाल्यानतर मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी जमा झाले दरम्यान पोलिसांनी या कार्यक्रमाविषयी प्रारंभी कानावर हात ठेवले असतानाच शिवडी रेल्वे स्थानक ते बारादेवी या ठिकाणी पोलिसांचा भला मोठा पोलीस आणि आरपीएफचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता . प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि कडक तपासणीत भिडेंचा हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भीम आर्मी दलित युथ पँथर तसेच बीआरएसपी या संघानेच्या कार्यकर्त्यांना भिडेविरीधात तीव्र निदर्शने केली होती .
प्रारंभी लालबाग येथील भिडेंचा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर विनापरवाना शिवडी बारादेवी येथील कार्यक्रमास महानगरपालिकेच्या शाळेत आयोजित केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत महानगर पालिकेने कार्यक्रमास कशी काय परवानगी दिली या कार्यक्रमास महानगरपालिकेने कोणत्या आधारावर परवानगी दिली याची चौकशी करून पालिका आयुक्त ,संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांवर अराजक माजविण्यास जबाबदार धरून त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी रात्री उशिरा मुंबई शहर परीमंडळ ४ च्या पोलीस उप आयुक्त (DCP) एन अंबिका यांना पत्र देऊन केली आहे . त्वरित कार्यवाही न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही कांबळे यांनी दिला आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम