भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अतुल कोल्हे यांच्यावर कारवाही कधी ? मनपा आयुक्त अजोय मेहता करतील का कारवाही?

दानाबंदरच्या पंचतारा बार मालकाने बळकावली फुटपाथ

मुंबई महानगर पालिका बी वार्ड मध्ये कार्यरत पालिका ठेकेदारांच्या भ्रष्टाचारास पाठीशी घालणाऱ्या सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे यांच्यावर पालिका आयुक्त अजोय मेहता काय कारवाही करतात याकड़े लोकांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत अतुल कोल्हे ?
मुंबई मनपाच्या बी विभागात मेंन्टनस(परिरक्षण) खात्यात सहाय्यक अभियंता पदावर अतुल कोल्हे कार्यरत आहेत.



नेमके काय आहे प्रकरण ?
दै.आदर्श महाराष्ट्रात मंगळवार 27 नोव्हेबर 18 रोजी 'अतुल कोल्हे यांच्या आशिर्वादाने फुटपाथचे झाले गोडाऊन' अशा मथळयाखाली बातमी प्रकाशित झाली होती.त्यात वाड़ीबंदर ब्रिज वरील ठेकेदाराने केलेल्या बांधकाम साहित्याच्या फुटपाथ वरील अतिक्रमणाची माहिती दिली होती.ठेकेदार एम.ई.इंफ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड यांनीच हे अतिक्रमण केलेले होते.बातमी नंतर पालिकेने तुटपुंजी कारवाही करीत ते अतिक्रमण थोड्याप्रमाणात काढले आणि समोरच्या फुटपाथवर टाकून आता तेथे अतिक्रमण करण्यात आलेले आहे.
याच अतिक्रमण करणाऱ्या ठेकेदार कंपनीस पालिकेने कोणताही आर्थिक दंड केला नाही .याचे काहीच कारण पालिका देत नाहिये.
याच संदर्भात पालिका आयुक्तांनी अतुल कोल्हे यांचेवर काय कारवाही होणार ते तरी निदान स्पष्ट करावे. अशी मागणी  लोक करीत आहेत.

प्रकरण दूसरे:
पालिका पालिका विभागाने वाडी बंदर येथील झोपडपट्टी काही दिवसांपूर्वी निष्कासित केलली.त्यावेळी सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई धडाक्यात करण्यात आली. आज येथे मोठ्या प्रमाणात पुन्हा झोपड्या बांधण्यात आलेल्या आहेत.या झोपड्या झोपडी माफीयानी बांधलेल्या असून लोक तेथे पुन्हा राहण्यास आलेली आहेत. अतुल कोल्हे यांनी यासंदर्भात दुर्लक्ष केल्यामुळे झोपडी माफीयांची हिम्मत वाढलेली असून त्यांचा तेथे राबता आहे. या झोपड्या बांधल्यानंतर विक्री करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की झोपडी माफियांना पालिका अधिकारी संरक्षण देत आहेत का ? कारण एकदा कारवाई करून तोडण्यात आलेल्या झोपड्या पुन्हा कशा काय उभ्या राहिल्या ? याचे उत्तर पालिका अधिकारी देऊ शकतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनता आणि पालिकेचे "कर दाते" उपस्थित करीत आहेत.

 

प्रकरण तिसरे : 
दाणाबंदर लिलाधर लखमशी मार्ग येथील लिलावती बिल्डिंगच्या फुटपाथवर एक अनोखे अतिक्रमण पाहण्यास मिळत आहे.येथील फुटपाथवर "पंचतारा बियर बार" चे मालक शेट्टी यांनी फूटपाथ गिळंकृत केलेला आहे.या फुटपाथवरील पालिकेने बसविलेले पेवर ब्लॉक काढून त्या ठिकाणी शेट्टी यांनी स्वतःच्या मर्जीने चकचकीत टाइल्स बसविलेल्या आहेत.जेणेकरून या बियर बार मध्ये मयसभेत येणाऱ्या बेवड्यांना,गिर-हाईकांना बरे वाटेल त्याच प्रमाणे हॉटेलच्या  सजावटीत सुंदरता वाढेल याकरिता त्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केलेले दिसून येत आहे.त्याचप्रमाणे लोखंडी पाईप वेल्डिंग करून लावलेले असून ते जमिनीत काढलेले आहेत.अशाप्रकारे फुटपाथवरून जाणारा पादचारी मार्ग बंद करून त्यावर कब्जा केलेला आहे. यासंदर्भात काही स्थानिकांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की या "पंचतारा बिअर बार" च्या शेट्टी नामक मालकाने आपल्या बापाची जायदात समजून ही फूटपाथ काबीज केलेली आहे असेच दिसते आहे.ती फुटपाथ तात्काळ पालिका अधिकाऱ्यांनी नागरीकांसाठी मोकळी करावी अशी मागणी होत आहे.या बाबत काहीच्या बोलण्यात आले आहे की या बारचा मालक आणि सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे यांची चांगली ओळख असल्याने ही फूटपाथ गिळण्याचा प्रकार शेट्टी यांनी केलेला आहे.अशा अनेक ठिकाणी म्हणजेच देवजी रतनंशी मार्ग,इंडियन सेलर समोरील,आजूबाजूच्या फुटपाथवरील थाटण्यात आलेले हॉटेल-भटार खाने हे सर्व अनधिकृतपणे दिवस-रात्र सुरू असून याकडे कोल्हे डोळेझाक करीत आहेत अशी विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या सर्व बाबी लक्षात घेत पालिका  आयुक्त अजोय मेहता यांनी कामात कसूर करणाऱ्या सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे यांच्यावर कडक कारवाही करावी अशी मागणी स्थानिक जनता करीत आहे.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट