
बोरिवली स्टेशनजवळील १ हजार ८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई; ६८५ अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर देखील झाली कारवाई
'आर मध्य' विभागाच्या धडक कारवाईमुळे रस्ते झाले मोकळे
- by Adarsh Maharashtra
- Dec 12, 2018
- 504 views
बोरिवली रेल्वे स्टेशन लगतच्या पूर्व व पश्चिम बाजू कडील परिसरातील रस्त्यावंर उद्भवलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा येण्यासह पादचा-यांनाही त्रास होत होता. तसेच अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही संभाव्य प्रतिकूल परिणाम होऊ शकत होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन परिमंडळ ७ चे उपायुक्त श्री. अशोक खैरे यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या 'आर मध्य' विभागाद्वारे दि. २७ नोव्हेंबर २०१८ पासून निष्कासनाची धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये १ हजार ८८५ अनधिकृत फेरीवाल्यावंर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून यामध्ये अनधिकृत भाजी विक्रेते, फळ विक्रेते, कपडे, कटलरी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांचा समावेश आहे. सदर कारवाईमुळे आता बोरिवली स्टेशन परिसरातील रस्ते व पदपथ मोकळे झाले आहेत. परिणामी, पादचा-यांना मोकळे पदपथ मिळण्यासह रस्त्यांवरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत झाली आहे, अशी माहिती 'आर मध्य' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
महापालिकेच्या 'आर मध्य' विभागात बोरिवली स्टेशनजवळील पूर्व व पश्चिम बाजूचा परिसर, मागाठाणे, दत्तपाडा, सुदाम नगर,काजूपाडा, गोराई, चारकोप, बोरसापाडा इत्यादी परिसरांचा समावेश होतो. याच विभागाच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्टेशनजवळच्या परिसरात उद्भवलेल्या फेरीवाल्यांमुळे पादचा-यांना अडथळा होण्यासह वाहतूकीच्या गतीवर देखील प्रतिकूल परिणाम होत होता. यासर्व बाबींमुळे बोरिवली स्टेशनलगतच्या परिसरात मोहीम स्वरुपात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान १ हजार ८८५ अनधिकृत फेरवाल्यांकडील साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये ६८५ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचादेखील समावेश होता. या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील ३२ गॅस सिलिंडर, १०२ स्टोव्ह वा शेगड्या जप्त करण्यता आल्या आहेत, अशीही माहिती श्री. बिरादार यांनी दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम