राज्य मानवी हक्क आयोगाने साजरा केला मानवी हक्क दिवस


मुंबईदि. 10 : सध्याच्या काळात मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे. या हक्काच्या अमंलबजावणीसाठी प्रत्येक ठिकाणी यंत्रणा निर्माण करावीअसे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी आज येथे केले.      

मानवी हक्क दिनानिमित्त राज्य मानवी हक्क आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मनोहर बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय,अंमलबजावणी संचालनालयाचे विभागीय संचालक विनित अग्रवाल,टाटा सामाजिक संस्थेचे अधिष्ठाता अरविंद तिवारीआंतरराष्ट्रीय न्याय अभियानचे संजय मकवानराज्य मानवी हक्क आयोगाचे प्रभारी अध्यक्ष एम. ए. सईदप्रभारी सचिव दिलीप बनकर आदी उपस्थित होते.

श्रीमती मनोहर म्हणाल्या,जागतिक स्तरावर अनेक ठिकाणी मानवी हक्काबद्दल जागृती निर्माण होत आहे. महामंडळेस्वयंसेवी संस्थांबरोबरच प्रत्येक व्यक्तिवर मानवी हक्काबद्दल जनजागृती करण्याची जबाबदारी आहे. सामाजिकआर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात मानवी हक्काची अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. दहशतवादाचा सामना करत असताना मानवी हक्काचे उल्लंघन होऊ नये. रोजगार संधीकृषी उत्पादन खरेदीशेतकऱ्यांना योग्य दर मिळणे आदींचा समावेशही मानवी हक्काच्या व्याख्येत व्हायला हवी. त्याचबरोबर प्रत्येक अर्थसंकल्पात मानवी हक्कांसाठी योग्य तरतूद व्हावी. त्याचबरोबर कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमध्येही मानवी हक्कांच्या अमंलबजावणीसाठी निधी उपलब्ध व्हायला हवा. प्रत्येक व्यक्तिस सन्मानाने जगण्याचास्वातंत्र्याचा हक्क मिळावायासाठी त्यातून प्रयत्न व्हावेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. क्षत्रिय म्हणालेजीवन,स्वातंत्र्यसमता व सन्मान यातून मानवी हक्काचे सार सांगता येते. लोकांना निर्धारित कालावधीत सेवा मिळण्याचा हक्कही मानवी हक्काचा एक भाग आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्य लोकसेवा हक्क कायदा आणला. या कायद्याद्वारे समाजातील प्रत्येक स्तरावरील नागरिकास हवी असलेली सेवा कोठूनही व निर्धारित काळात मिळविता येत असल्यामुळे समानता व स्वातंत्र्याचा हक्क अबाधित राहतो. सध्या राज्य शासनाच्या विविध 492सेवा या कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आल्या आहेत. ऑनलाईन प्रणालीमुळे जनतेस पारदर्शक,गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्यास मदत होत आहे. लवकरात लवकर सेवा मिळावीयासाठी आपले सरकार या संकेतस्थळ तसेच आरटीएस महाराष्ट्र या मोबाईल ऑपद्वारे अर्ज करता येते. तसेच राज्यात सुमारे 26 हजार आपले सरकार सेवा केंद्राद्वारेही नागरिकांना अर्ज करता येते.

श्री. अग्रवाल म्हणालेदेशातील सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील मानवी हक्क आयोग हा सक्रिय असून शक्तीशाली आहे. सध्या सर्वच स्तरावर मानवी हक्काची जागृती झाल्यामुळे कोणतीही कार्यवाही करताना पोलीस अधिकारी हे सजग झाले आहेत. मात्रअद्याप मानवी हक्कासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. मानवी हक्क भंगाची तक्रारीची शहानिशा करत असताना त्याच्या सर्व बाजूचा उहापोह होणे आवश्यक आहे.

प्रभारी अध्यक्ष श्री. सईद यांनी मानवी हक्काच्या वैश्विक घोषणा दिनाच्या इतिहासाचा आढावा घेऊन म्हणालेमानवी हक्कांची जनजागृती करण्यासाठी 10 डिसेंबर 1948रोजी जगभरातील 58 देश हे संयुक्त राष्ट्रसंघात एकत्र आले व त्यांनी मानवी हक्कांची घोषणा केली. गेल्या सत्तर वर्षात जागतिकस्तरावर मानवी हक्काच्या जपवणुकीसाठी कार्य होत आहे. राज्यातही राज्य मानवी हक्क आयोगाच्या माध्यमातून नागरिकांच्या हक्काबद्दल जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. व्यक्तिच्या जातीचात्याच्या दर्जाचा विचार न करतात्याचा सन्मान व प्रतिष्ठा राखण्यासाठी आयोग काम करत आहे.

यावेळी श्री. तिवारी व श्री. मकवान यांनी मानवी हक्कासंदर्भात होत असलेल्या कामांची माहिती व्याख्यानातून दिली. तसेच टाटा सामाजिक संस्था व आंतरराष्ट्रीय न्याय मिशनच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. श्री. बनकर यांनी आभार मानले.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट