
अखिल भारतीय दलित शोषण मुक्ती मंचच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड
- by Adarsh Maharashtra
- Dec 07, 2022
- 218 views
मुंबई - बिहार येथील बेगुसराय जिल्ह्यात नुकताच संंपन्न झालेल्या अखिल भारतीय दलित शोषण मुक्ती मंचच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा उपस्थित प्रतिनिधींनी अधिवेशनातच केली.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दलित शोषण मुक्ती मंचाचे ३ राष्ट्रीय अधिवेशन बिहार मधील बेगुसराय जिल्हातील राहुल सांस्कृत्यान नगरामध्ये ३,४,५ डिसेम्बर रोजी संपन्न झाले. यावेळी देशतील सर्व राज्यातून सुमारे ३५० निवडक प्रतिनिधी या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झाले. या अधिवेशनात दलितांचे घटनात्मक अधिकार, अत्याचार, जमिनीं, रोजगार, शिक्षण या विषयीवर चर्चा होऊन आंदोलन रूपरेषा ठरविण्यात आली.
महाराष्ट्रातुन कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची राष्ट्रीय उप्ध्याक्षपदी नियुक्ती करण्यात आल्या बद्दल दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितिचे प्रमुख, दलित चळवळीतील अभ्यासक आणि सक्रिय कार्यकर्ते सुबोध मोरे, शेकाप नेते ॲड .राजू कोरडे यांनी अभिनंदन केले आहे.तसेंच महाराष्ट्र तसेच देशभरातून कांबळे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कॉम्रेड कांबळे ३५ वर्षे दलित,आदिवासी, शोषितांच्या प्रश्नावर मोठी आंदोलने केली असून सातत्याने दलित अत्याचार घटना विरोधात लढा देत आले आहेत. खैरलांजी हत्याकांड,असो वा रमाबाई आंबेडकर हत्याकांड,जवखेडा असेल किंवा मुंबईतील आकाश जाधव याचा खून. या सर्व घटनां मध्ये कांबळे यांनी आंदोलन करून न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केला. दलित अन्याय अत्याचार विरोधात आक्रमक लढा देण्याच्या कार्याची पावती म्हणून त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असे सांगण्यात येते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम