मुंबईत भगवान सहस्रार्जुन जयंती साजरी !

मुंबई : अखिल मुंबई जायसवाल युवा मंचातर्फे कलचुरि राजवंशचे आराध्य भगवान श्री सहस्रार्जुन यांची जयंती जायसवाल समाज भवन येथे मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला राज राजेश्वर श्री सहस्रार्जुन जयंती साजरी केली जाते.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री सहस्रार्जुन यांच्या सामूहिक आरतीने करण्यात आली. त्यानंतर विशेष संगीतमय भजन व सुंदरकांडचे पठण करण्यात आले.

अखिल मुंबई जायसवाल युवा मंचचे अध्यक्ष माताप्रसाद गुप्ता आणि सरचिटणीस दिनेश जायसवाल यांनी उपस्थित सर्व कुटुंबियांना भगवान श्री सहस्रार्जुन यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात युवा मंचचे प्रमुख संरक्षक हिरालाल गुप्ता, भारतीय कलचुरि  जायसवाल समवर्गीय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लालचंद गुप्ता, संरक्षक रामकुमार गुप्ता, महिलाध्यक्षा अंजू गुप्ता, करुणेश जायसवाल, अशोक जायसवाल, कोषाध्यक्ष दिनेश गुप्ता, संजय कलवार, शिव जायसवाल,अनिल गुप्ता, अरविंद जायसवाल, लक्ष्मी गुप्ता, सीमा गुप्ता, रेखा जायसवाल, कोकिला जायसवाल, राकेश जायसवाल, विजय जायसवाल तसेच जायसवाल समाजातील शेकडो संख्यांनी भाविक उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट