मुंबईत धडकणार शेतकऱ्यांचा उलगुलान मोर्चा

महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या न्याय्य हककांसाठी ठाणे ते आझाद मैदान ४५ किमी अंतर पार करून लोक संघर्ष मोर्चा दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत धडकणार


मुंबई,(प्रतिनिधी):लोक संघर्ष मोर्चाच्या सोबत लोकशासन आंदोलन, श्रमिक एल्गार संघटना सामील मोर्चाची सुरवात दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ रोजी हजारों च्या संख्येने शेतकरी एकत्र येतील. सकाळी १० वाजता या मोर्चाची सुरवात "आनंद दिघे प्रवेशद्वार " येथील जुना चेकपोस्ट नाका येथे सभा होईल. या सभेस माजी निवृत्त्त न्यायाधीश बी.जी कोळसे पाटील, पाणीवाले बाबा राजेंद्र सिंग, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे , खासदार राजू शेट्टी, काळूराम धोंडे धोदडे आदी संबोधतील.  नंतर मोर्चा ईस्टर्न एक्सप्रेस वरून मुंबईत सोमय्या मैदानात सभा घेऊन मुक्काम घेण्यात येईल. २२ तारखेला सोमय्या मैदानातून पहाटे निघून भायखळा जे.जे. फ्लायओव्हर मार्गे आझाद मैदान येथे सभा होईल . हे आंदोलनाचे नेतृत्व लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संजय महाजन, राजू गायकवाड़, जिला वसावे ,ज्योती बढेकर, फिरोज मिठीबोरवाला व सचिन धांडे करतील,

काय आहे शेतकऱ्यांच्या मागण्या :- 
* उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा व तो मिळण्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करण्यात यावी. 
* पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्वरित त्या जमिनीचे मालक बनवण्यात यावे. व त्यानंतर त्यांच्या जमिनी सुधारण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून त्याचा आराखडा सादर करावा. 
* विजेवर सर्वांचा सामान अधिकार असल्यामुळे शहराप्रमाणे शेतकऱ्यांच्या सुद्धा समान लोड शेडींग असावी व शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा. 
* वनपट्टे धारकांना व ज्यांचे वन दावे प्रलंबित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत व पीक कर्जे मिळावी. 
* पेसा कायद्या मुळे शेड्युल ५ अंतर्गत येणाऱ्या गावांची पुनर्रचना करून वगळण्यात आलेली गावे सामाविष्टे करून घेण्यात यावी.
*आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे जिरायत जमिनीला हेक्टरी ५० हजार व बागायत जमिनीला हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे.
* दादासाहेब स्वाभिमान योजना व स्वाभिमान सबलीकरण योजना या अंतर्गत महाराष्ट येत्या काळात किती दलित व आदिवासींना जमीन मिळणार आहे याचा आराखडा हवा. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट