
सम्यक समता प्रतिष्ठानचे "क्रांतीज्योती" पुरस्कार जाहीर
संध्या दोशी, दीपशिखा वारे, डॉ. ज्योत्स्ना पवार, आशा ब्राह्मणे यंदाचे मानकरी
- by Adarsh Maharashtra
- Jan 02, 2022
- 430 views
मुंबई: ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी महिला आणि समाजातील शोषित, वंचित घटकांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जाणले. हे कार्य तडीस नेण्यास त्यांना मनुवाद्यांकडून प्रखर विरोध सहन करावा लागला. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साथीने तत्कालीन सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड करून त्यांनी समाजामध्ये शैक्षणिक आणि आधुनिक विचार रुजवून बलशाली भारत करण्यास अमूल्य असे योगदान दिले.
अशा या महान कर्मयोगी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चारकोप येथील सम्यक समता प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने "शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, महिला पोलीस, कायदेतज्ज्ञ, पत्रकारिता, महिला संघटन" अशा विविध क्षेत्रातील कर्मयोगी महिलांचा दरवर्षी "क्रांतीज्योती" पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यंदाचे पुरस्काराचे प्रथम वर्ष आहे.
राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका व शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या विपुल दोशी, पोलीस दलातील आपल्या धाडसी आणि जिगरबाज कामगिरीमुळे ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग महिला पोलीस निरीक्षक दीपशिखा दीपक वारे, वैद्यकीय तसेच विपश्यना क्लिनिकच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये करण्याऱ्या डॉ. ज्योत्स्ना पवार, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या आशा अशोक ब्राह्मणे आदी मान्यवरांना ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आयदानकर उर्मिलाताई पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दैनिक आदर्श महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक ॲड.राहुल वारे भूषविणार आहेत.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी जेतवन सांस्कृतिक केंद्र,बुद्ध विहार, चारकोप, कांदिवली येथे संपन्न होणार आहे . मास्कचा वापर करीत तसेच कोविड नियमांचे पालन करीत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव सी.ओ. ढिवरे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण के. साळवी, अशोक कांबळे, रमेश गणवीर, रवींद्र गजभिये, मिलिंद खरात, मधुकर ननावरे, भाऊसाहेब केदार आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम