
५४ वी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्रात उस्मानाबाद मध्ये २४ ते २८ मार्चचा मुहूर्त!! तर ५७ वी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पालघरला
- by Adarsh Maharashtra
- Feb 16, 2021
- 1838 views
मुंबई : या वर्षीच्या ५४ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला असून सदर स्पर्धा २४ ते २८ मार्च दरम्यान उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येणार आहे.
श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे २४ ते २८ मार्च या कालावधीत पुरुष व महिला गटाच्या ५४ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याचे भारतीय महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी सांगितले. सदर स्पर्धा आयोजन करताना कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा खेळवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
याआधी उस्मानाबाद जिल्ह्याने एक फेडरेशन चषक खोखो स्पर्धा व पाच राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धांचे आयोजन केले होते. उस्मानाबाद जिल्ह्याने राष्ट्रीय स्पर्धेतील 10 उत्कृष्ट खेळाडू या देशाला दिले आहेत, चार शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू सुद्धा या जिल्ह्याने दिले असून एक क्रीडा मार्गदर्शक (श्री. चंद्रजीत जाधव) व एक क्रीडा संघटक (श्री. शाहू खोगरे) पुरस्कार सुद्धा या जिल्ह्याने मिळवला असून नुकताच खोखोत पुन्हा एकदा सुरू झालेला अर्जुन पुरस्कार सारिका काळे हिने पटकावला आहे. या जिल्ह्याने तीन आंतरराष्ट्रीय खोखो खेळाडू दिले असून, तब्बल दोनशे पेक्षा अधिक राष्ट्रीय खेळाडू खोखो ला दिले आहेत. अशा या जिल्ह्यात पहिलीच राष्ट्रीय खो-खो स्पर्धा होत असताना वातावरण खोखोमय झाले आहे.
राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा विरारला
तर या राष्ट्रीय स्पर्धे आधी ५७ वी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा, विरार, जिल्हा पालघर येथे १० ते १३ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. सदर स्पर्धा ओल्ड विवा कॉलेज मागील मैदान, विवा कॉलेज रोड, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर येथे होणार असून 24 जिल्ह्यातील पुरुष व महिला संघ या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सहभागी होतील असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी कळविले आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम