मा. खा. संजय पाटील यांच्यातर्फे भांडूप व मुलुंड येथे श्रवणयंत्राचे मोफत वाटप

मुलुंड:(शेखर भोसले)  मा.खासदार व ईशान्य मुंबई लोकसभा समन्वयक संजय दिना पाटील यांच्या पुढाकाराने व आमदार, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, प्रभाग समिती अध्यक्षा दीपमाला बढे यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अलियावर जंग राष्ट्रीय श्रवणविकलांग संस्था, दिल्ली यांच्या माध्यमातून  शुक्रवार दिनांक १२ फेब्रु. रोजी "श्रवण चाचणी व मोफत श्रवण यंत्र वाटप" चा कार्यक्रम पराग विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज तलाव जवळ, भांडुप येथे आयोजित करण्यात आले होते.

विक्रोळी, भांडुप, व मुलुंड विधानसभा मतदारसंघातील अनेक  कर्णबधिर व्यक्तींनी या उपलब्धतेचा लाभ घेत आपली तपासणी करून घेतली. या वैद्यकीय तपासणीत 143 पात्र लाभार्थ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. "माजी खास. संजय पाटील यांच्या मुख्य पुढाकाराने कर्णबधिर लोकांना मुख्य प्रवाहात आणणारा हा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन्ही कानांचे श्रवण यंत्रांची किंमत सामान्य व्यक्तींना परवडणारी नसते.  एका सेटची किंमत हि १५ हजार रुपयांहून अधिक असते, गरीब परिवारातील सदस्यांना हा खर्च परवडत नाही, अशा परिस्थितीत अथक प्रयत्नाने सदर कार्यक्रम आयोजित करून विक्रोळी, भांडुप, मुलुंड मधील कर्णबधिर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्र देवून संजय दिना पाटील यांनी मोठे समाज कार्य केले आहे. सदर कार्यक्रमातील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी वेगळाच आनंद दिसून येत होता. त्यामुळे या उपक्रमाचे अनन्य साधारण महत्त्व आहे", अशी माहिती स्व.दिना बामा पाटील प्रतिष्ठानच्या कुमारी राजोल संजय पाटील यांनी दिली..  

मा.खास.संजय पाटिल, आम.रमेश कोरगावकर, मा.आम.अशोक पाटील, कु.राजोल संजय पाटील, मामा मंचेकर, सुभाष वाकोडे, राजेंद्र मोकल, दामोदर राणे, मनिषा तुपे, फहिम कुरेशी, अँड. वासुदेव मंचेकर, तसेच भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. पराग विद्यालयाचे संचालक, उपविभागप्रमुख पराग सुभाष बने यांचे मौलिक सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट