मानवमुक्ती क्रांतीलढ्याचा महान साक्षीदार असणाऱ्या चवदार तळ्याचे सुशोभीकरण होणार कधी ? डागडुजी होणार कधी ?

भिमपँथर मा.राजेश गवळी यांचा सवाल.

मुंबई (प्रतिनिधी)आम्हीही हाडामांसाची जिवंत माणसे आहोत , आम्हालाही जगण्याचा अधिकार असून , आम्हाला आमचे मूलभूत अधिकार द्या , असा समतावादी पुकारा करीत.....आम्हीही ह्या देशाचे नागरिक असून , ह्या देशातील साधनसंपत्ती वर आमचाही इतरांप्रमाणेच अधिकार असून , तो आमचा मूलभूत अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे , अशी समतावादी भीमगर्जना करीत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी "पिण्याच्या पाण्यासाठी जगातील पहिला समतावादी लढा" उभारला. त्या महान ऐतिहासिक लढ्याला २० मार्च २०२१ रोजी ९४ वर्ष पूर्ण होत आहेत.दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन भीमविचारांना , आंबेडकरी लढ्याला  , क्रांतिभूमीला नतमस्तक होतात. परंतु आजघडीला ह्याच चवदार तळ्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून , २० मार्च २०२१ च्या अगोदर ह्या ऐतिहासिक चवदार तळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे ,  अशी मागणी भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केली आहे.

१९८९ मध्ये महाड नगरपरिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्षांच्या ह्यांच्या कारकिर्दीत चवदार तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते.त्यानंतर आजतागायत ह्या तळ्याच्या सुशोभीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे चवदार तळ्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे.त्याकडे प्रशासनाने ताबडतोब लक्ष देण्याचीही विनंती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केली आहे. तसेच ह्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी २०११ मध्येच विकास आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे , परंतु दुर्दैवाने हा विकास आराखडा लालफितीत अडकून धूळ खात पडला आहे.ह्या विकास आराखडाबरहुकूम शासनाने काम करावे , असेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले आहे.

चवदार तळ्याच्या रोषणाई आणि कारंजांसह चवदार तळ्याच्या परिसरातील रस्ते , पदपथ तसेच माता रमाई सभागृहाची दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवण्याची व्यवस्था प्रशासनाने करून आंबेडकरी जनतेच्या भावनांची कदर करावी , असेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट