
मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांचा 5000 खाटांच्या हॉस्पिटलचा जमीन घोटाळा सिद्ध झाला “आपल्या बिल्डरकडून 2100 कोटीं रुपयांची जमीन घेण्याचा प्रस्ताव रद्द”- डॉ. किरीट सोमैया
- by Adarsh Maharashtra
- Feb 03, 2021
- 534 views
मुंबई : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहल यांनी कोविडच्या नावाने मुंबईत 5000 खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने रु. 2100 कोटींचा जमीन घोटाळ्याचे नियोजन केले होते.
स्वत:च्या परिचित बिल्डरची मुलुंड येथील जमीन जी मूळ राज्य सरकारच्या मालकीची ती 2100 कोटी रुपये देऊन विकत घ्यायची असे षडयंत्र मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहल यांनी सुरु केले.
दि. 23 ऑक्टोबर, 2020 रोजी डॉ. किरीट सोमैया यांनी एका पत्रकार परिषदेद्वारा ठाकरे सरकारच्या या घोटाळाचा खुलासा केला होता. मुलुंड पूर्व मधील स्वास कन्स्ट्रक्शन कंपनीची जमीन या 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी योग्य असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या कमिटीने रिपोर्ट दिला. ही जमीन आयुक्तांनी रुपये 2100 कोटींमध्ये विकत घेण्याचे निर्देशही दिले. आयुक्तांच्या निदर्शनाला खाली या कमिटीने स्वास कन्स्ट्रक्शन कंपनीची ही जमीन 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी उचित असल्याचा रिपोर्ट व निर्णय दिला, ती जमीन घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली. 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी 2100 कोटी रुपयांची जमीन व 9500 कोटी रुपयांचे बांधकाम, हॉस्पिटलचे साहित्य व त्या सोबतचे कन्व्हेन्शन सेंटर असे मिळून एकंदर रु. 12000 कोटी रुपयांचा प्रकल्प मुंबई महापालिका आयुक्तांनी गैरकायदेशीररित्या पुढे सरकवला.
या घोटाळ्याच्या विरुद्ध महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॉ. किरीट सोमैयांनी दि. 30 ऑक्टोबर, 2020 मध्ये एक तक्रार याचिका दिली. माननीय राज्यपाल यांनी ही याचिका महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे तपासासाठी पाठविली.
आश्चर्याची बाब कॉंग्रेस पक्षाचे, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते श्री. रवी राजा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हा घोटाळा थांबवावा असे आह्वान ही केले होते.
अशा 5000 खाटांच्या हॉस्पिटलचा निर्णय कोणाचा हे एक गूढ रहस्यच आहे. मुंबई महापालिका, आरोग्य मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, कोविड टास्क फोर्स, नगर विकास मंत्रालय अश्या सगळ्याच विभागांनी हा निर्णय आमचा नाही, आम्ही असे हॉस्पिटल बांधण्याची शिफारस केलेली नाही असे स्पष्टपणे सांगितले.
मुंबई महापालिकेने आमच्या एका माहिती अधिकार अर्जाच्या अंतर्गत कळवले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. 20 जुलै, 2020 रोजी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत महापालिका आयुक्तांच्या “कानात” (खाजगीत) ही गोष्ट सांगितली आणि म्हणून महापालिका आयुक्तांनी सगळे नियम धाब्यावर बसून 4 दिवसात मुलुंड येथील मुख्यमंत्र्यांच्या परिचित बिल्डरची स्वास कन्स्ट्रक्शनची जमीन या 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी हस्तगत करण्याचा उपक्रम सुरु केला.
आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहल यांनी दि. 6 ऑक्टोबर, 2020 रोजी राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना पत्र/अहवाल सादर केला आणि 5000 खाटांचे हॉस्पिटल कसे आवश्यक आहे व त्यासाठी मुलुंड येथील स्वास कन्स्ट्रक्शन कंपनी/बिल्डरची जमीन अत्यंत योग्य आहे, तिथे हॉस्पिटल उभे करावे, त्यासाठी मुंबई महापालिकेनी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे असे पत्र/अहवाल पाठवले.
ठाकरे सरकारनी महापालिकेचा अहवाल (रिपोर्ट) हातात घेवून स्वास बिल्डरकडून जमीन विकत घेण्याची प्रक्रिया ही सुरु केली यासाठी नगरविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जलदगतीने कार्यवाही सुरु केली. दि. 10 डिसेंबर, 2020 रोजी महाराष्ट्र सरकारनी मुंबई महापालिकेकडून ही जागा संपादित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे मदत मागितली.
मुंबई महापालिका आयुक्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या नावाने हा 12000 कोटी रुपयांचा हॉस्पिटल घोटाळा करत आहेत असे सगळे पुरावे आम्ही लोकायुक्तांना दिल्यानंतर आता दि. 11 जानेवारी 2021 रोजी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला एक पत्र/अहवाल पाठवून असे कळवले आहे.
“5000 खाटांच्या हॉस्पिटलकरिता मुंबई महापालिकेकडून कोणतीही जागा निश्चित करण्यात आलेली नाही महापालिकेनी या संदर्भात जमीन निश्चित करण्याची जी प्रक्रिया केली होती ती आता आम्ही रद्द केली आहे. आमचे या आधिचे सगळे रिपोर्ट रद्द समजावे”.
अखेर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्तांचा 5000 खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने रु. 2100 कोटींचा जमीन घोटाळा बारगळला.
दोषी कोण? मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे की महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहल. दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम