
स्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल
- by Adarsh Maharashtra
- Nov 13, 2018
- 869 views
मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बदनामीकारक वक्तव्य छत्तीसगढ़ येथील जगदलपुर येथे जाहीर सभेत केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या विधानाने सर्व देशभक्त जनतेची मनं दुखावली आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केल्यामुळे सर्व सावरकर कुटुंबियांना तसेच सावरकरांच्या लक्षावधी अनुयायांना तीव्र मनस्ताप झाला आहे, असेही तक्रारीत नमूद केले आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची हात जोडून माफी मागितली” असे धादांत खोटे विधान करुन त्यांची बदनामी केली आहे. एका थोर क्रांतिकारकाचा आणि राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्यामुळे त्यांच्याविरोधात ही तक्रार केली असून भारतीय दंड संहिता 500 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यानुसार संबंधितांना दोन वर्षे कारावास किंवा दंड अथवा दोन्हींची शिक्षा होण्याची तरतूद भारतीय घटनेत आहे.
संबंधित पोस्ट
Support US
विश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
Support US
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम