
भारताच्या पोशिंद्यावर झालेला हल्ला निंदनीय असून , आम्ही लोकशाहीवादी भारतात हुकूमशाही कदापि सहन करणार नाही.
भिमपँथर मा.राजेश गवळी यांचे ठोस प्रतिपादन.
- by Adarsh Maharashtra
- Jan 27, 2021
- 715 views
मुंबई(प्रतिनिधी) ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय जनता हर्षोल्लासात तल्लीन होती , मग्न होती.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला दिलेल्या मौलिक अधिकारांचा उत्सव साजरा करीत होती , असे असताना दुसरीकडे मात्र त्याच लोकशाहीवादी भारतात हुकूमशाही राजवटीचे विकृत हिडीस प्रदर्शन सुरू होते.२६ नोव्हेंबर पासून म्हणजे संविधान गौरवदिनापासून दिल्लीच्या उघड्या रस्त्यावर- सीमेवर थंडी-वाऱ्याची पर्वा न करता सातत्याने आपल्या न्याय अधिकारांची संवैधानिक लढाई लढणाऱ्या आमच्या अन्नदात्यांवर , इथल्या बळीराजावर , लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा होत असलेल्या प्रजासत्ताक दिनीच क्रूरपणे लाठीहल्ला होणे हे भारतीय परंपरेला , भारतीय लोकशाहीला कलंकित करणारे कृत्य होते , ह्या निंदनीय घटनेचा आम्ही ठाणे जिल्हा भीम आर्मीच्या वतीने तीव्र धिक्कार करीत असल्याचे भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य नेते आणि ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराशी संवाद साधताना म्हंटले आहे.
ह्या देशातील शेतकऱ्यांवर हा लाठीचार्ज झालेला नसून , तो इथल्या लोकशाहीवर झालेला हल्ला आहे , मानवी अधिकारांवर झालेला क्रूर हल्ला असून ह्या लोकशाहीवादी भारतात आम्ही असली हुकूमशाही प्रवृत्ती कदापि सहन करूच शकत नाही.आम्ही भीम आर्मी ठाणे जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारच्या ह्या कृत्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले आहे.
भिमपँथर मा.राजेश गवळी म्हणाले की , लाल किल्ला आमच्या देशाचा गौरवशाली सांस्कृतिक ठेवा असून , आमच्या सामाजिक ऐक्याचे महान प्रतिक आहे. ह्या देशात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्ध प्रणित "माणूस" केंद्रस्थानी मानून लोकशाही प्रणाली जन्माला घातली , म्हणून लोकशाहीत माणूस महत्वाचा असून ह्या माणसांवर होणारा हल्ला हा लोकशाही वरील हल्ला आहे.भारतीय शेतकरी हा कोणी जातीयवादी , धर्मांधवादी , आतंकवादी नसून तो आमचा अन्नदाता आहे , आमचा पोशिंदा आहे , त्याच्यावर झालेला लाठीचार्ज हा सदासर्वदा निंदनीय असाच असल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र राज्याचे संवैधानिक मुख्य कारभारी असणारे राज्यपाल महोदय मात्र आपल्या जबाबदारी मधून पळ काढताना दिसून आले.दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवून शेतकरीविरोधी तिन्ही काळेकायदे रद्द व्हावेत म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शेतकरी संवैधानिक मार्गाने मोर्चा घेऊन मुंबईत आले , परंतु आपला न्यायाधिकार मागण्यासाठी कडाक्याच्या थंडीतून आलेल्या बळीराजाला भेटावयास ह्या राज्याच्या राज्यपालाला वेळ मिळत नाही.कंगना राणावत सारख्या जेमतेम दर्जाच्या नटीला तात्काळ भेट देणारे राज्यपाल आमच्या बळीराजाला भेटण्याचे टाळत आपल्या जबाबदारीतून पळ काढतो , हेच ह्या राज्याचे फार मोठे दुर्दैव असल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी उद्वेगाने म्हंटले आहे.अश्या असंवेदनशील व्यक्तीला राज्यपाल पदासारख्या संवैधानिक पदातून मान्यवर राष्ट्रपती महोदयांनी तात्काळ पदमुक्त करावे , अशीही भावना भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी बोलून दाखवली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम