
श्री उध्दव ठाकरे हिशोब द्या !! कोर्लाईच्या मालमत्ताची खरी किंमत किती ?? -डॉ. किरीट सोमैया
- by Adarsh Maharashtra
- Jan 20, 2021
- 577 views
मुंबई: शिवसेना अध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे परिवारांनी अलिबाग जवळ कोर्लई गावात कै. अन्वय नाईक यांच्याकडून जमीनी / मिळकती घेतल्या.
“या जमीनीचा हिशोब अजून स्पष्ट होत नाही !”
सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने कोर्लई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमिनी मिळकती २९ एप्रिल २०१४ मध्ये घेण्यात आल्या. या जमिनीचे करार ग्रामपंचायत मध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्याच्यावरील १९ बंगले या संबंधीच्या घरपट्टया, ठाकरे आणि वायकर परिवाराद्वारा करण्यात आलेल्या कराराच्या प्रती आमच्याकडे उपलब्ध आहेत.
१० कोटीची मालमत्ता २.१ कोटी रुपयात ! श्री अन्वय नाईक यांच्याकडे २००४ पासून कोर्लई गावात ३०हून अधिक जमिनी होत्या. २००९मध्ये या जमिनीवर १९ घरे ग्रामपंचायत, सरकारी परवानग्या घेऊन श्री. अन्वय नाईक यांनी बांधल्या. एकंदर २३,५०० चौ.फू. बांधकाम करण्यात आले.
२००९ पासून २०२१ पर्यंतची या १९ बंगल्यावरील घरपट्टी, पाणीपट्टी व वीजकर ग्रामपंचायत / शासनाकडे भरण्यात आले आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंत अन्वय नाईक हे भरत होते. १ एप्रिल २०१४ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंतची घरपट्टी, पाणीपट्टी व वीजकर सौ. रश्मी उद्धव ठाकरे आणि सौ. मनिषा रविंद्र वायकर यांनी भरले आहे.
२९ एप्रिल २०१४ रोजी ठाकरे परिवार व अन्वय नाईक यांच्यामध्ये करार झाला. ३० एप्रिल २०१४ रोजी त्याचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले.
“ठाकरे/नाईक परिवारातील खरेदीखत मधील माहिती”
सौ. रश्मी उद्धव ठाकरे, सौ. मनिषा रविंद्र वायकर आणि श्री. अन्वय मधुकर नाईक मध्ये २९/०४/२०१४ रोजी झालेले खरेदी खत.
तलाठी संजा, साळाव हद्दीतील मौजे कोलंई, ता. मुरुड येथील सर्वे नंबर
२२/३क, २२/४. २२/६, २२/८. २३/१अ. २३/१३. २३/२. /३. २३/४. २३/७. २३/८. २३/ए. २३/१९. २३/११., २६/१० २६/१. २७/२, २६/३, २६/४. २६/५ २६/६. २८/७. २६/७अ. २६/८ व, २६/८, २६/११. २६/१२. २६/१३ २७/३. ४१/२.
उपरोक्त वर्णन केलेल्या या सर्व भातशेती, संपूर्ण मिळकती, त्या मिळकती मधील असणारी बागायत माडे, घरे, पडीक जमिन, वाई-बारग, दगडमोडामाह-पाना सहीत सर्व मिळकती या खरेदीखताचा विषय आहेत.
सरकारी बाजारभावाप्रमाणे किंमत रक्कम रु. ४.१४.०२,०००/-
प्रत्यक्ष खरेदी मोबदला किंमत रक्कम रु. २,१९,००,००९/-
सदर मिळकती रक्कम २,१९.००,०००/-(रूपये दोन कोटी दहा लाख मात्र) एवढया किमतीत विकत घेण्याच्या ठरविल्या आहेत.
२९ एप्रिल २०१४ मध्ये ज्या दिवशी करार रजिस्टर झाला त्यावेळेला फक्त जमिनीचा बाजारभाव रु. ४.१४.०२,०००/- होते.
ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डप्रमाणे २०२०/२०२१ मध्ये या जमिनीवर बंगल्याचे रेडीरेकनर/बाजारमूल्य रु. ५.२९.००,०००/-
ठाकरे/वायकर परिवारांनी अन्वय नाईक यांस फक्त रु. २.१०,००,००९/- रुपये दिले. रु. १० करोडची जमीन व बंगले रु. २.१० करोड मध्ये
“ठाकरे सरकार हिशोब द्या!"
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम