
माहुलगाव नागरिकांच्या पुनर्वसनप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक - गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता
- by Adarsh Maharashtra
- Nov 12, 2018
- 1908 views
मुंबई : प्रदुषणामुळे माहुलगाव चेंबूर येथील नागरिकांचे आरोग्य बिघडल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज मंत्रालयात सांगितले. ते आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या माहुलगाव घर बचाव समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना बोलत होते, मेहता म्हणाले कायस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय होईपर्यंत संबंधित कुटुंबांना एचडीआयएल येथे ट्रान्झीस्ट घरे देता येणे शक्य आहे. तसेच त्याच जागेवर पुनर्वसन करण्याची शक्यता तपासली गेली पाहिजे. हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी, गृहनिर्माण विभाग, पर्यावरण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी तसेच संबंधित अन्य विभाग यांच्यासह मुख्यमंत्री यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल.
या भागातील विविध कारखान्यामुळे प्रदुषणात वाढ झाली असून नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. न्यायालयाने या प्रश्नी कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुंबई महानगर पालिकेने पुनर्वसनाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. या बाबत शासनाने महानगरपालिकेला कळविले आहे, असेही मेहता यांनी सांगितले.
यावेळी मेधा पाटकर यांनी माहुलगावच्या नागरिकांचे प्रश्न मांडून लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी श्री. महेता यांच्याकडे केली. तसेच शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा, घरबचाव कार्यकर्त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणणार असल्याचे मेहता यांनी शेवटी सांगितले. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम