ढिसाळ बँक व्यवस्थापन,अजून एका सहकारी बँकेचं लायसन्स रद्द

उस्मानाबाद,दि.१२ :महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचं लायसन्स आरबीआयनं रद्द केलंय. उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केलीय. बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचंही आरबीआयनं म्हटलंय. विशेष म्हणजे बँकेचं लायसन्स रद्द झालं तर कोणत्याही ग्राहकाची ५ लाखा पर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. ती त्यांना परत मिळण्याची गॅरंटी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ९९ टक्के ग्राहकांचा पैसा सुरक्षित आहे.या कारवाईमुळे बँकेला आजपासून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेने एक प्रेसनोट रिलीज करून वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

कालपासून म्हणजेच ११ जानेवारीपासून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही माहिती देताना बँकेचा परवाना रद्द करण्याची अनेक कारणंही दिली आहेत. बँकेची सध्याची वित्तीय स्थिती पाहता ही बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ आहे, असं एक प्रमुख कारण आरबीआयने दिलं आहे. २०१७मध्ये या बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घालूनही बँकेने वित्तीय स्थिती सुधारली नाही. त्यामुळे बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेत हजारो ठेवीदारांच्या लाखो ठेवी आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट